Sunday, February 20, 2011

केव्हा होणार "नवनिर्माण"

केव्हा होणार "नवनिर्माण"

वाटलं होत आता या खेपेस या महापुराकडे दुर्लक्ष करायचे. पाहुन न पाहिल्या सारखे करुन सर्वांप्रमाणे पुढे निघुन जायचे. 






आपल्या पक्षाचे नगरसेवक, आमदार, खासदार निवडुन आल्यावर त्यांना घेवुन एकविरा देवीच्या दर्शनाला मिरवणुकींनी येणाऱ्यांच्या नजरेत संपुर्ण कार्ला गडाला पडलेला हा प्लास्टीकचा विळखा कार्यकर्त्यांच्या , नेत्यांच्या भीड मधे कुठुन पडायला आलाय ?

ठाकरे घराण्याची कुलदेवता असलेल्या या एकविरादेवीच्या स्थानाची अनावस्थेमुळे झालेली अवस्था खुप वाईट आहे.



परत येथे नुसतेच देऊळच नाही तर येथली लेणीही एकवेमद्वितीय आहेत. 

गरज आहे ती या साऱ्या परिसरात प्लास्टीकच्या पिशव्यांना बंदी घालण्याची, पातळ पिशव्यात ओटीचे सामन भरुन देण्याऱ्यांना व घेवुन त्या पिशव्या तशाच वाऱ्यावर सोडुन देणाऱ्यांना जबरी दंड करण्याची.

गरज आहे ती दोन्ही भावंडांनी निदान या देवीच्या कामापुरते तरी एकत्र येवुन आपल्या सैंनीकांना आदेश देवुन या साऱ्या परिसरातील प्लास्टीक नी प्लास्टीक वेचुन तो साफ करुन घेण्याची.     

No comments: