Monday, July 13, 2009

जपानच्या नृत्यांगना काओरी नाका

Sunday, July 12, 2009

पुन्हा एकदा "आशा"






शनिवार आला. राजाभाऊ बायकोला म्हणाले ’चल आज तुला आराम , आज स्वयपाकघरात म्हणुन पाय ठेवायचा नाही " .

मस्त पावसाळी धुंदंफुंद नशीला माहोल, चमचमीत, मसालेदार जेवण जेवणाचा मोह काय आवरेना. काय मनी धरुन निघाले होते. मारे मनात मांडे खात होते. येथे जावु तेथे खाऊ.
पण.

पण जी बायको नवऱ्याच्या बेतात मोडता घालणार नाही (नेहमीच) , ती बायको कसली.

"अजीबात नको. आषाढ सुरु आहे. या दिवसात साधे, सात्वीक जेवावे."

मग ती आणि ते आपटॆ रस्तावरील "आशा डायनींग हॉल " मधे जेवायला गेले.
काचऱ्याची बटाटा भाजी ,वांग्यांचे भरीत , पडवळाची भाजी ( देवा तुच माझा रक्षणकर्ता , पडवळाची भाजी खाण्याचे मला धैर्य दे ), डाळभात, आणि रसम. अमर्यादीत जेवण. केवळ ५५ रुपयात. "

Saturday, July 11, 2009

टाटा स्कायची जादु. पिक्चर गायब


जणु पावसाची वर्दी देण्याचे काम टाटा स्काय करते, पाऊस सुरु झाला की पिक्चर गुल.

Wednesday, July 08, 2009

स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

राजाभाऊ आणि स्व.राजीव गांधी , दोघांचा जन्म मुंबई मधला ना, एकाच सुतीकागृहातला. डॉ. पुरंदरेंच्या कडे.

मग, स्व.राजीव गांधी मुंबईकर की !

वाह उस्ताद वाह

आपल्या आगमनाची वर्दी देण्यासाठी त्याच्याकडे काहीच साधन उरले नव्हते, त्याची ती प्रिय सखी, ती सौदामीनी, ती तर त्याला सोडुन केव्हाच गेली होती, आतमधे , तबल्यावर कडकडत राहण्यासाठी आणि तो आषाढातला मेघ बाहेर तिच्या विना, तिच्या आठवणीत तुफान बरसत राहीला.

सभागृहाच्या आत सारे तालाचा वर्षावात , जलधारात गच्च ओलेचिंब होत होते, मग बाहेर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाची काय तमा.

काल झाकिर हुसैन च्या शिष्यवर्गांनी गुरुपोर्णिमा साजरी केली.

शेवटी मन प्रफुल्लित केले ते उस्ताद झाकीर हुसैन, फाझल कुरेशी आणि योगेश साम्सी यांच्या तबलावादनानी.

काल किती तरी काळानंतर राजाभाऊंचे मन प्रसन्न झाले, शांत झोप लागली.

सर्वांना असाच गुरु लाभो.

Sunday, July 05, 2009

साहेब मोठे हुश्शार हो.

साहेब मोठे हुश्शार हो.

एका दगडात दोन पक्षी मारले की.


वांन्द्रे- वरळी सी लिंकला राजीव गांधींचे नाव सुचवले , कॉंग्रेस वाले खुष, नामांतरकारणॆ, सध्या हाती काहीच मुद्दा नसलेल्यांना काहीतरी मुद्दा मिळाला म्हणुन ते ही खुष.
चला या निम्मीत्ते तरी का होईना, वीर सावरकरांची आठवण तरी आली.

सराफा तेरी याद मे पेट हुवा बैचेन रे

याद आ रही है इंन्दोर तेरी याद आ रही है.
५६ व सराफ्याची फार याद येवुन राहिली आहे. किती तरी वर्षे झाली इंन्दोर वारी झालेली नाही.
भुट्टे का कीसवाले भैय्या वाट बघत असतील.


Saturday, July 04, 2009

एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते है कोग

जेव्हा कलावंत येतात , गातात आणि निराशा करतात

जावळ


मेनलॅंड चायना - पुणॆ

Corn and Potato Tsing Hoi style
Lotus leaf wrapped Rie with Corn Kernal & Almonds.






Wontons


Wontos and crispy veg. in Chilli Plum Sauce
राजाभाऊंच्या बायकोने पुण्याला ज्या संकुलात ते रहातात तेथे एक स्नॅक्स कांउंटर उघडला आहे. बिच्चारी काल दिवसभर साबुदाणॆ वडे, उपवासाचे थालीपिठे, तळुन तळुन, बटाट्याची काळीमीरी घालुन केलेली भाजी, रताळ्याचा किस करुन दमली असेल, आता तिला परत रात्री घरी जेवण करावे लागु नये या शुद्ध हेतुने राजाभाऊ निघाले बाहेर.
त्यात परत या ब्लॉगर मंडळींनी फार घोटाळा करुन ठेवला आहे, श्री.शंतनु घोषनी सांगावे http://www.shantanughosh.com/ व राजाभाऊंनी ऐकावे.
पण एक गोष्ट खरी , सर्वोत्तम चायनीस जेवायचे असेल तर मेनलॅंड चायना ला पर्याय नाही.
हा कमळाच्या पानात शिजवलेला फ्राईड राईस एवढा आवडला आहे , delicacy नी एवढे खुष केले आहे की दर खेपेस आता दुसरे काही तरी मागवु असे ठरवले असतांना देखील तोच मागवला जातो.

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय




या महेंगाई के जमानेने मे प्रत्येक गोष्टीचे दर, भाव शेकडो पटीने वाढत असता अजुन पर्यंत वाढली नाही ती मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची वर्गणी.




महिना तीस रुपयात वाचकांना जे वाचायला मिळाते त्यास तोड नाही.

Friday, July 03, 2009

काहे मेहा बरसत नाही




विठ्ठल विठल, आम्ही पण निघालोय बर का वारीला











जेव्हा कलावंत न आल्यामुळे निराशा होते आणि आयोजकांच्या भुमिकेचाही राग येत नाही

डॉ. शशिकांत तांबेचे घर. मु,पो. इंन्दोर. श्री.राहुल देशपांडे यांचे गाणे.

राहुल देशपांडे इंन्दोर मधे रविंद्र सभागृहात दिवाळी, पाडवा पहाट कार्यक्रम सादर करण्यासाठी आलेले.
एक दोन दिवस आधी डॉँ. शशिकांत तांबेंच्या घरी संध्याकाळी राहुल देशपांडेच्या गाण्याची एक घरगुती महफिल.
पण राहुल आले नाहीत, संयोजकांनी विरोध दर्शवल्या मुळे. मुख्य कार्यक्रमाच्या आधी दुसरे कार्यक्रम करु नयेत हे भुमीका उचीत.

पण चला निदान डॉ. शशिकांत तांबे यांचे गाणे ऐकायला मिळाले

रामदासी मल्हार

आणि कलावंत जेव्हा निराशा करतात व आयोजक ?

गरवारे महाविद्यालय। पुणे
सभागृह तुडुंब, खच्चुन भरलेले, जणु मुंबईतील लोकलच्या डब्यात सकाळची वेळ.
मुंगीला सुद्ध्या आत जायला जागा नसावी.
बाहेर ही वऱांड्यांत रसीक उभे, उभ्याने तरी का होईना, स्वर्गीय गाणे ऐकण्यासाठी.
सर्वांना प्रतिक्षा होती केव्हा एकदा मुकुल शिवपुत्र येतात आणि आपली तृप्ती करतात.

बाहेर संयोजक फार व्यस्त होते आणखीन आणखीन तिकीटे विकण्यात.
मुकुल शिवपुत्र आलेले नाहीत, येणार नाहीत हे ठावुक असतांना देखील आणि त्यांच्या जागी आपण विजय सरदेशमुखांना गायला लावणार आहोत हे सर्वांपासुन लपवुन.

Thursday, July 02, 2009

जेव्हा कलावंत निराशा करतात त्यांचा गोष्ट.

"मेघमल्हार." , नेहरु सेंटर आयोजीत फार प्रतिष्ठीत, दर्जेदार संगीत महोत्सव, गेली १९ वर्षे नेहरु सेंटर तो सातत्याने सादर करत आले आहे.

महफील संपल्यानंतर मीता पंडीत परत गौड मल्हार ची विलंबीत बंदीष गायला बसल्या तेव्हाच पुढचे कलाकार , जयतिर्थ मेवुडी आलेले नसावेत हे ध्यानी आले. ट्रफिक मधे अडकले असतील येतील लवकरच वाटु लागले.
पण त्यांचा पत्ता नाही.
नेहरु सेंटरच्या डौ. काझींनी मग त्याचे खरे कारण सर्वांना सांगीतले.
जरी त्यांना नेहरु सेंटर नी आमंत्रित केले होते, नेहरु सेंटर नी त्यांचा मुंबईत कार्यक्रम ठेवला होता, तरी देखील नेहरु सेंटरला सरळने येता ते त्या आधी मालाडला दुसऱ्यांकडे ध्वनीमृद्रण करण्यासाठी गेले. आणि मग वाहतुकीत अडकले.
राजाभाऊंसारखे काही जण खोट्या आशेने वाट बघत थांबले बाकीचे निघुन गेले.
पण यातुन एक चांगले गोष्ट हाती लागली. त्यांच्या ऐवजी काही राजस्थानी लोककलाकारांनी मल्हार वर एक कार्यक्रम सादर केला तो ऐकायला मिळाला, जो ऐरवी ऐकणे कठीण होते.

सखियां झुलन चली रे फुलबागीयांन | घीर आई कारी कारी बदरीया ||

नेहरु सेंटर आयोजीत "मेघ मल्हार " ला जातांना छत्री न घेता जाणे व वाटेत पावसानी भिजवले तर दोष पावसाचा नाही, संयोजकांचा नाही, कलाकारांचा तर नाहीच नाही आणि "मल्हार " रागांचा तर अजीबात नाही. असलाच तर तो राजाभाऊंचाच आहे.

एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नसेल , ती होवुन गेलेली असेल. तुम्ही ती घडत असतांना त्या स्थळी उशीरा पोहोचता आणि तुमच्या हाती फारसे काही लागलेले नसते.

पण
पण तरी देखील ती अकस्मात तुमच्या वाट्याला येते. जे हुकले आहे ते मिळते.
हे गौंड्बंगाल काय आहे ?
मुंबईच्या संथगती वाहणाऱ्या वाहतुकीने चर्चगेट ते वरळी जवळजवळ दिड - पावणे दोन तास घेतले. मीता पंडीत गात असलेला सुरदासी मल्हार संपत आला होता. हाती लागली ती कजरी आणि टप्पा.

कार्यक्रम संपला. आता प्रतिक्षा होती ज्यांचे गाणे ऐकण्यासाठी हा जो हट्टाहास केला त्या जयतीर्थ मेवुडींच्या गाण्याची.
आणि अचानक मीता पंडितांचे गाणे पहिल्या पासुन सुरु झाले. गौड मल्हार ची विलंबीत बंदीश.
का पण का ?

Tuesday, June 30, 2009

जा रे जारे बादरवा आणि कारी कारी बादरीया

या आठवड्यात मुंबई मधे मुसळधार बारीश होण्याची दाट शक्यता आहे असे राजाभाऊंच्या सुत्रांकडुन समजण्यात येते.
अचानक पर्जन्य अनुकुल होण्यास, सक्रिय होण्यास का सुरवात झाली याचा शोध घेता व त्याची कारणमीमांसा करतांना असे लक्षात आले की यास काल पासुन कर्नाटक संघात सुरु झालेला " वर्षा उत्सव २००९ " जबाबदार आहे.
उद्या पासुन नेहरु सेंटर मधे सुरु होणारा "मेघ मल्हार " त्यात भर घालण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात भरीस भर म्हणुन रविवारी पं. पंढरीनाथ कोल्हापुरे व त्यांचा शिष्य वर्ग क़ुमारजींचा " गीत वर्षा " हा कार्यक्रम सादर करणार आहेत.

काल शौनक अभिषेकींनी धमाल केली. गौड मल्हार, कुक्कुभ मल्हार, वृंदावनी की मल्हार, सावन (मीरा भजन ) गावुन तापलेल्या रसीकांच्या मनास तृप्त केले. त्यांनी गायलेला रागमाला हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला. बंदीश एक पण अनेक रागांमधे गुंफलेली, मधेच एकेका ओळीर चक्क दोन दोन राग. असे कधी ऐकणे झाले नव्हते.

त्यांच्या आधी श्री. योगेश हुन्सवाडकर यांनी मीयां का मल्हार व नानक की मल्हार ऐकवुन योग्य ती वातावरण निर्मीती केली होती.
आता वेध लागले आहेत मंजुषा कुलकर्णी पाटील यांना ऐकण्याचे

Monday, June 29, 2009

९० : १०


महाराष्ट्र टाईम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया , दोन्ही एकाच गृपची वर्तमानपत्रे।


.टा. महाविद्यालयीन प्रवेशाच्या बाबतीत च्या S.S.C विद्यार्थांची बाजु घेतो तर टाइम्स ऑफ इंडिया ICSE , CBSE च्या विद्यार्थांची.

हे गौडबंगाल काय आहे ?

Saturday, June 27, 2009

जयपुर अत्रोली घरण्याची गायकी.

आतापर्यंत आयुष्यात बऱ्यापैकी गाणे ऐकले, नुसतेच ऐकले, कोरडेपणाने, जाणुन न घेता, जाणण्याचा प्रयत्न न करता, न कळता, न वळता, गाणे म्हणजे काय ते समजुन न घेता.
आज N.C.P.A Mumbai ने एका अप्रतिम कार्यशाळेचे, चर्चासत्राचे आयोजन केले होतो.
जयपुर अत्रोली घरण्याची गायकी.
श्रुती सडोलीकर, पं दिनकर पणशीकर, पं.अरविंद पारिख व पं. सत्यशील देशपांडे यांनी त्यात भाग घेतला.

घराणे म्हणजे काय व या घराण्याच्या गायकीमधील रस, रसभाव, आकार, एकार, रागांची निवड, जोडराग, तालाची निवड, बंदीशीची निवड, रागाची बढत, ताना, तानांची पद्धत आदींवर या कार्यशाळेत श्रुती सडोलीकरांनी फार माहितीपुर्णक सादरीकरण केले.
चर्चा व प्रात्याक्षिके, आणि त्यात पं।सत्यशील देशपांडे यांनी आपल्या संग्रहातुन आणलेली केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, निवृत्तीबुवा सरनाईक, वामनराव सडोलीकर आदींनी गायलेली गाणी , चार साडे चार तास कसे निघुन गेले कळलेच नाही.

चला करोडोच्या दौलतीमधला एखादा पै हाती लागला.

आणि आषाढाच्या तिसऱ्या रात्री

कहु किससे मै क्या है शबे-गम बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता

Friday, June 26, 2009

आषाढाच्या प्रथमदिवसे आणि भगत ताराचंद

आषाढाच्या प्रथमदिवसे ज्यांची प्रिया त्यांच्या बरोबर असते त्यांच्या खिशाची चांगलीच वाट लागते.
"तुला कसे कळले माझ्या मनात काय आहे ? "
"किती तरी दिवस झाले .... "
"कळले. आज संध्याकाळी आपण तुला मंगलदास मार्केट मधे जावुन एखाद्या ड्रेससाठी कपडा घेऊ, मग पर्स, आणि मग किती तरी दिवस विनयमधे पातळभाजी पाव खायला जायचे म्हणत होतीस ते ही करु "
"मी आज घरी जेवायला आम्ही नाहीत म्हणुन सांगितले आहे "
"माहिती आहे मला, आपण आता भगत ताराचंद मधे (मुंबादेवी) जेवायला जाणार आहोत."
तुला कसे कळॅले माझ्या मनात काय आहे ते? "
भगत तारांचंद मधली डाळ फ्राय तिची अत्यंत आवडती, त्यात तळुन घातलेला तो कांदा. ती शेव टौमेटोची भाजी, ती खस्ता रोटी, बटर मारके. मारवडीपद्धतीचे देशी जेवण येथे खुप चविष्ट मिळते.
(पुण्याला जातांना तळेगावच्या टोलनाक्या कडे त्यांची शाखा आहे. मुंबई वरुन आमच्या कडे पुण्याला गाडी घेवुन येतांना राजाभाऊंच्या मेहुणीच्या पोटात गोळा येतो. बहिणीचा फरमाईश असते, भगत ताराचंद कडे थांबायचे व डाळ फ्राय पार्सल आणायची )
पण त्यात तिचा एकच वांदा झाला, नेमके राजाभाऊंच्या हाती " मेघदुत " होते, चालतांना वाचत चालायचे, खरेदी करतंना वाचत खरेदी करायची आणि वाचत वाचत जेवायचे.

नशीब, भडका उडला नाही.

नाहीतर आषाढस्य प्रथमदिवसे ,झगडा आणि अबोला. यक्षाची एक लहानशी झलक मिळता मिळता राजाभाऊ बचावले

आषाढाच्या दुसऱ्या दिवसे आणि मोती महाल

वांद्राला टर्नर रोड वर असलेले मोती महाल कधीतरी नजरेत भरले होते, केव्हातरी येथे जेवायला जायचे मनात धरले होते , पण जाणे काही होत नव्हते. मग अचानक योग जुळुन आला. रात्रीच्याला तेथे जेवायला जायचा. राजाभाऊंचे काका त्यांना घेवुन मोतीमहाल मधे जेवायला गेले.


सुरवातीला आम्ही क्रिस्पी भेंडी मागवली, पाताळ्शी भेंडी कापुन ती कुरकुरीत तळलेली. व्हे. कबाब नक्की कोणते मागवायचे या बाबतीत राजाभाऊंच्य मुलाचा चांगलाच गोंधळ माजला, त्या वर तोडगा म्हणुन त्याने मग सर्व मिक्स कबाब मागवले, ते ही चवीला चांगले होते. त्यातली ती लहानुशी तंदुरी, धुरकटलेली बटाटी, अहा, लाजबाब, ती त्यांनी आणखीन द्यायला हवी होती, भरमसाठ पनीरच्या ऐवजी


पण भाज्यांनी मात्र अंमळ निराशा केली. काश्मिरी दम आलु, लहानसे आलु, त्यात मस्तपैकी काहीतरी गोडुस भरलेले , पण एकंदरीत ही भाजी आणि त्या बरोबर मुलानी मागवलेली बहुदा पनीर मसाला चांगल्या पैकी सुकी होती, त्या मुळे खाणे जड जात होते, डाळ मागवायला पाहिजे होती.

मग पुढे आणखीन काही मागवायचा कंटाळा आला.

मग राजाभाऊंच्या बायकोला अचानक सांताकृझ मधल्या "गोकुळ" मधे मिळणारे श्रीखंड आठवले. मग काय ते आणायला वाटेत रस्तात थांबणे.