Sunday, August 31, 2008

भट्ट जेवले टट्ट फुगले बिछान्यावरी जावुनी स्वस्थ निजले, बायको म्हणे काय झाले , अरे ****च्या माझे पोट्ट फुगले.


आपल्या नवरा किती रोडावलाय, बिच्चाऱ्याला आठवडाभर बाहेर जेवायला लागते, किती हाल होत असतील त्याचे ?


आठवडाभरात मेहनत करुन जे काही वजन कमी केले जाते ते दर शनिवार, रविवारी भरुन काढण्याचा चंग तिने बाळगलेला दिसतोय. परत अपिल करण्याची सोय नाही.

ताटात जे काही पडॆल ते मुकाट्याने गिळायचे, भोजनभाऊंनी. पुढे बोलायचे नाही.

आजचा बेत फार फर्मास होता, भरली वांगी, या चा मसाला किती लाजबाब लागतो, त्यात दाण्याचे कुट टाकलेले असले तर वा ! अमॄतानंदच ! पण येवढ्याने तिचे समाधान होत नाही. जोडीला पिठले, शेवगाच्या शेंगा टाकुन केलेले, चव आणखी चविष्ट करण्यासाठी माफक प्रमाणात टाकलेली आमसुले. नवऱ्याला आणखीन खुळावायचे असल्याने मग यासोबत ज्वारीची गरमागरम भाकरी ( तुप, लोण्याचा गोळा व्यर्जीत ), लसणाची, शेंगदाण्याचे चटण्या. इंद्रायणी तांदळाच्या केलेल्या भातासमोर काहीसे तिखट बटाट्याचे भुजणे.


आई ग ! तुझ्या हातच्या स्वयपाकाची चव विसरलो ग !


या साऱ्यांचा आस्वाद घेतांना काय बिशाद आहे जेवतांना मान वर करुन बघण्याची ?


या आळसावलेल्या देहाला आता प्रवास करायला लावायचे ? कसे व्हायचे ?

मुंबईमधे मंडपातील पडद्याआड झाकलेल्या श्री गणॆशाला मोकळा श्वास घेवु द्या

मुंबईस आता वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे.
सार्वजनीक गणेशोत्सव मंडळांनी भल्यामोठाल्या उंच उंच श्री गणेशाच्या मुर्त्यांची स्थापना मंडपात करावी, मग तो मंडप तिन्ही बाजुनी झाकुन घ्यावा, समोरच्या दर्शनी बाजुस पडदा लावुन तो बंद करावा. मग श्रींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी लांबलचक रांगा लावाव्यात, तासनतास एकाच मुर्तीचे दर्शन घेण्यासाठी ताटकळत उभे रहावे, मुठभर बिनडोक कार्यकर्त्यांनी, बालगोपाळांनी, आपल्या मर्जीनुसार, लहरीनुसार रांगेचे नियंत्रण करावे, आपल्या मंडपासमोर भलीमोठी रांग लागली आहे, यात धन्यता मानत. आता आपलेच मंडळ सर्वाधीक लोकप्रिय असा गोड गैरसमज करु घ्यावा, लोकांचा वेळ, श्रम, त्रास, शारीरीक कष्ट, सोय यांना तुच्छ लेखावे, मागील दाराने खास प्रवेशा साठी पासेस ची विक्री करावी, त्यात पैसा कमवावा. संपुर्ण दिवस भक्तांनी रांगेत केवळ आपल्याच मंडळाच्या गणपतीचेच दर्शन घेण्यात घालवला पाहीजे असा अट्टाहास करावा.
दादांनो, पडदा उघडा पडदा. द्या घेवुन दर्शन भाविकांना मुक्त हस्ते, झटपट, त्यांना बऱ्याच गणेशमुर्तींचे दर्शन घ्यायचे असते हे ध्यानी बाळगा, जरासा विवेक दाखवा, पैसे कमवायला, आपली मनमानी करायला इतर बरेच मार्ग आहेत की.

छातीत दुखते, कळ आली ?

काय हो राजाभाऊ, हे पुर्वश्रमाचे व्ही.आय.पी. , यांच्या छातीत अचानक कसे काय दुखायला लागते ? त्यांची तब्बेत अचानक कशी काय बिघडते ? त्यांना मग रुग्णालयात दाखल करावे कसे लागते ?

अहो अटक झाल्या नंतर हो ?

Saturday, August 30, 2008

नवी मराठी "साम" वाहीनी आणि टाटा स्काय

नविन मराठी विनाशुल्क "साम’ नामक वाहीनी सुरु झाली. टाटा स्काय वर ती दिसेल अशी अपेक्षा होती.
अपेक्षा अजुन पुरी झाली नाही.
कदाचीत टाटा स्काय वाल्यांना ती पहिल्या दिवसापासुन सुरु करावी असे मनापासुन वाटले नसेल.

बहार धुंद वेलीवर यावा हळुच लाजरा पक्षी गावा





हाय क़ब्बत तुने इडली नही खायी ! "इडली हाऊस" मधे




आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.


स्पर्धेत टिकुन रहाण्यासाठी उडपी उपहारगृहांनी आपल्या मेन्युत आतापर्यंत काय काय, अनेक बदल केले, देशोविदेशाच्या नवनव्या खाद्यपदार्थांची त्यात भर टाकली ( फक्त मराठी खाद्यपदार्थ सोडुन इतर सर्वकाही ) पंजाबी म्हणा, चायनीज, मेक्सीकन, इंटरकॉंटीनेंटल, नवे नवे खाद्यपदार्थ आपल्या ग्राहकांना देण्यास सुरवात केली. अगदी त्यात परत " जैंन " व्हर्जन वेगळॆ.


हे सारे करतांना त्यांचा मुळ बाज, आत्मा केव्हाच हरवुन गेला. पण आता एक वर्तुळ पुर्ण झाले आहे. बॅक टु स्वेयर वन.


"इडली हाऊस" मधे फक्त, हो केवळ इडली व तीचे नानाविध प्रकार या आपल्या उपहारगृहात, इडलीप्रेमिकांसांठी, भक्तांसाठी मिळतात.


पंधरा दिवसापुर्वी मी माझा नेहमीचा नियम ,शिरस्ता मोडला. प्रत्येक भेटीत बरेच प्रकार चाखायचे, त्यांचा आस्वाद घ्यायचा हा नियम. पण नेमके त्या दिवशी मला म्हैसुर रवा इडली येवढी आवडली की मी ती खातच सुटलो. मग त्या पुढल्या रविवारी जरासे अपराधी वाटायला लागले.


मग सुरवात केली कांचीपुरम इडलीने. त्यानंतर वाटले आता खोट्टॊ इडली खावी. फणसाच्या पानात लपटलेली ही इडली खाताखाता मुढो इडली खाण्याची तिव्र इच्छा होवु लागली.


केवडयाचा सुगंध आपल्याला नेहमीच मोहवत असतो, मग त्याचा पानात लपेटुन शिजवलेली , केवडयाचा धुंध सुवास लेवुन समोर आलेल्या या इडलीचा रसस्वाद घेतांनाही आपण तसेच बेबंध होत जातो.


आज बकासुराला लाजवायचेच असे मनोमनी ठरवलेले , मग तांदुळ आणि नारळ यांच्या संगतीत खुलुन निघालेली उंडी इंडली आणि त्या नंतर काकडीच्या रसात नटलेली , स्वाद घेवुन बहरलेली काकडी इडली खाण्याचा मोह काहीसा अनावर झाला.


गोड गोड गोड, या गोडावर काहीसा उतारा हवाच . काय खावु, आता काय बरे खावु, हां आत्ता आठवले, पेपर इडली, काळीमीरीचा तिखटसा झणका घेतलेली इडली खावुन मग
"अन्नदाता सुखी भव !"


या साऱ्या इडलींच्या रुबाब, तोरा वाढवावा, लज्जतीत न्यारी भर पडावी म्हणोनी संगतीस मनमुराद मिळाणाऱ्या सांबार, नारळाच्या चटणी बरोबर मोल्गापुडी, लिंबडापुडी तीळाच्या, नारळाच्या तेलाबरोबर दिली जाते.


टिप. येथे अरसिकांसाठी साधी नेहमीची इडली देखील मिळते.

विजेते


परवा दिवशी वर्क आऊट करतांना कोच सांगत होते परदेशातील ऑलिंपिक्स मधील विजेते मायदेशी परतल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी टॅक वर सरावासाठी जातात, आपण कालपरवा पदके मिळावली आहेत हे विसरुन, आणि आपल्या कडले सत्कार समारंभात, भेटी स्विकारण्यात गुरफटुन जातात.


नेमके दुसऱ्याच दिवशी हि बातमी वाचली.


कदाचित माझ्या कोच ना या खेळाडुच्या सत्कार बरोबर आमच्या पुण्यात मुख्य पदाधिकाऱ्यांचा पण कसा सत्कार होतो, उदो उदो होतो, जंगी स्वागत होते हे ठावुक नसावे.

आज सासुनी किती छळले ?


सुखदुःखाच्या गोष्टी करायला या सारखे दुसरे स्थान नसावे.

Sunday, August 24, 2008

लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी आणि क्रिकेट

या लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी च्या नियमाप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा जसाजसा अधिकाधिक आस्वाद घेत जातो तस तसे त्या बद्दलची आपली आसक्ती, ओढ कमी होत जाते व एक वेळ अशी येते की ती आपल्याला नकोशी व्हायला लागते.

लग्नाची पंगत , जिलेबी, मठ्ठाचा बेत, ताटातली पहिली जिलेबी आपण मठ्ठात बुडवुन मुखी सारतो, अहाहा काय स्वाद आहे, ब्रम्हानंदी टाळी लागते, दुसरी, तिसरी, चौथी , पाचवी जिलेबी , आपण हाण हाण हाणतो, मजा येते, अजुन एक अजुन एक करत जिलेब्यांची थाळी संपवु लागतो, मग हळु हळु वेग मंदावत जातो, पोट व मन तुडुंब भरतो, आत्ता बस्स. आणखी खाणे मुश्किल. मग आग्रहाचे वाढणे. एक वेळ अशी येते की आता आणखी खाल्ली तर वमनच होईल.

पण प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.
आपल्या देशातले क्रिकेटचे वेड हा या नियमाला अपवाद. पुर्वीच्या काळी फक्त हंगामात खेळला जाणारा हा परकीयांचा खेळ आता दिवस रात्र ,चोवीस तास केळाला जातो व त्याच उत्साहाने भारतीय पहात रहातात, कंटाळा म्हणुन यायचे नाव नाही.

मग ह्या वेडापोटी ऑलींपिक्स मधल्या भारताच्या यशाअपयेशाकडे भारतीयांचे दुर्लक्ष होते. चार वर्षातुन येणारे सामने येवडाच त्याचा अर्थ. मग त्यात आपण भाग घ्यायचा ही औपचारीकता पाळण्या पुरतेच आपला देश हा ऑलींपिक्सकडे बघत असवा.

वर्तमानपत्रही एवढी क्रिकेटमयी झालेली आहेत की परवाच्याला जी दोन पदके कुस्तीत व मुष्टीयुद्धात मिळाली त्याची बातमी देतांना त्यांना त्या बातमीत क्रिकेटचा उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. म्हणॆ "या यशामुळे मुळे भारतानी श्रीलंकेवर मिळवलेल्या एक दिवशीय सामन्याकडे म्हणे कोणाचे लक्ष गेले नाही".

आता पुढील ऑलिपिक्स चार वर्षाने.

अग्रलेख, लेख तेच असतील. भारत अपयेशी का ठरतो यांची कारणमिमांसा करणारे.

कारवी फुलली आहेत.


सात वर्ष्याच्या अवधीने डोंगर उतारावरील कारवीची झाडे यंदाला फुलली आहेत. डोंगर उतारांवर या दिवसात कारवी व तेरड्यांच्या फुलांनी सडा घातला आहे.

काश ! असे हे नितळ हास्य माझ्या चेहऱ्यावर सदैव असते

Saturday, August 23, 2008

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनी चालली बळे ॥ धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥



वसंत ॠतु मधे अनेकविध रंगाची उधळण करुन काहीसा श्रमलेला निसर्ग , वर्षा ॠतु मधे अगदी ठरवुन केवळ हिरव्या रंगानी सारी श्रुष्टी रंगवुन काढत असावा. पण त्याने त्याचे समाधान होत नसावे, मग त्यात हिरव्या रंगाच्या नाना छटा देत बहरलेल्या सागाच्य़ा पांढुरक्या फुलांनी, फुललेल्या तेरडयांच्या किरमीजी, जांभळ्या, गुलाबी फुलांनी, जांभळ्या रंगाच्या कारवीच्यां फुलांनी काहीशी जाणवणारी उणीव भरुन काढत असावा. आणि हो , मधेच मग हिरव्या रंगाच्या मखमीली गालीच्या वर पिवळ्या जर्द रानफुलंनी नक्षीकाम ही करायला तो विसरत नाही. जेथे नजर जाईल तेथे केवळ हिरवाईच.

निसर्ग साऱ्या धरतीचे हे जे लाडकौतुक या दिवसात करत असतो ते न्याहाळण्यासाठी आज अचानक बेत ठरला, भोर परिसरात फिरायचा. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर, केवळ नितांत देखणा, जो आता पर्यंत का कोण जाणे पण पहायचा राहुनच गेला होता. आपण भ्रमण प्रेमी, प्रवासाच्या निमीत्ते अनेक परकीय प्रदेश फिरत असतो, पण नेहमीच आपल्या जवळ असणाऱ्या निर्सर्गलेण्याचे आपल्याला एक तर भान नसते किंवा आपण त्याची उपेक्षा तरी करत असतो.

इंगवली गावाजवळ नीर नदीचे चे देखणे रुप, जणु लावण्यवती स्त्री ने परिधान केलेला कंठहार. वळसे घेत ही नदी जो प्रवास करते तो पहाता भान हरपुन जाते.
त्या पुढे लागते ते आंबवडे गाव. पंतसचीवांचे गाव. येथेल्या नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी ओलांडवा लागतो तो एक छोटुसा झुलता पुल, अगदी लक्ष्मण झुल्याची आठवण करुन देणारा, ओढयाकाठच्या या देवालयाजवळचे पंचगंगा कुंड फार देखणे आहे. देवाच्या दर्शनासाठी येथे खळाखळाणारा ओढा अचानक झेप जो झेप घेतो ते दृश्य ही पहाण्यासारखे आहे.

आता वेध लागले होते ते समर्थांच्या शिवथर घळीच्या दर्शनाचे. आयुष्यात अनेक गोष्ठी नकळतपणे करायच्या राहुन जातात जसे की शिवथर घळीला भेट देणॆ. पण आज हा योग जुळुन आला.

हा पुढील रस्ता अक्षरश्या देहभान विसरायला लावतो, मंत्रमुग्ध करणारी ही वाट नीरादेवघर धरणाच्या, जलाशयाच्या कडेकडेने, काठकाठाने, वळसे घेत घेत हळुवार पणॆ पुढे सरकत रहाते.

वरंधा घाट. वाघजयीच्या ठाण्यापाशी, कडयाच्या पोटात उभे राहुन येथील डॊगररांगा पहाताना आपण किती शुद्र आहोत याची जाणीव व्हायला लागते. कावळ्याजवळी बाळ्या हा सुळाका तर लक्ष वेधुनच घेतो. समोरच्या डोंगर माथावरुन खाली खोल दरीत झेपवणारे धबधबे तर अचंबीत करायला लावतात, किती पाहु की किती नको. काय पाहु नी काय नको ? ह्या साऱ्या परिसराचे हिरवकंच , गच्च भरलेले जंगल, सदा प्रफुल्लीत , सदा सतेज अश्या या घाटातुन पायथ्याला असणाऱ्या शिवथर घळीला जाण्यासाठी उतरावे लागते.

या घळीच्या बाहेर असलेल्या धबधब्याचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात

गिरीचे मस्तकी गंगा । तेथुनी चालली बळे ॥
धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥१ ॥
गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनीकल्लोळ ऊठिला ॥
कड्याशी आदळॆ धारा । वात आवर्त होतसे ॥२॥

दुपारी गेल्या मुळे येथे प्रसादाच्या खिचडीचे चविष्ट भोजन चाखायला मिळाले, सोबत मस्त पैकी शिराही मिळाला. दुपारी १२ ते १.३०० मधे प्रसादाचे जेवण मिळते.

या परिसरात आता पाऊस थंडावलाय मग त्याची चव घेण्यासाठी परतांना महाबळेश्वर- पाचगणी मार्गे परतण्याचे ठरवले, नाही म्हटले तरी या परिसरात पावसाळ्यात जाणे झाले नव्हते, ते ही आज घडले.
पण त्याच आधी शिवथर घळ ते महाड रस्तावर श्रावणातल्या घन निळ्याने मनमुराद आम्हाला झोडपुन घेतले.

या दिवसात वातावरण फार मस्त असते, बऱ्यापैकी गारवा असल्याकारणाने प्रवास मनाला मोहीवत असतो.
आता वेध लागले आहेत सज्जन गडाचे.

Tuesday, August 19, 2008

पारसी नवे वर्षे

आज आमच्या कडेही पारसी नवे वर्षे साजरे करण्यात आले. जेवणाचा झक्कास मेन्यु होता. शाकाहारी धानसाक (खरे तर हा शुद्ध मांसाहरी पदार्थ आहे) व ब्राउन राईस. (टॉमेटो कोशींबर याबरोबर मस्त लागते.)
याचे कारण म्हणजे प्रेमळ पारसी लोकांबरोबर असणारे नातेसंबंध. त्या काळात माझ्या आत्यानी एका पारशाशी प्रेमविवाह केला. (जे त्यांच्या काय किंवा आपल्यासुध्धा धर्मीयांना सहजी पचनी पडणे, स्विकारणे अशक्यच होते. ) तसेच माझ्या बहिणीची सासु देखिल पारसीच.
आज दोघे ही हयात नाहीत. पण त्यांच्या स्म्रुती सदैव काळजात कोरलेल्या आहेत.

નવુ સાલ મુબારક

નવલ, અર્નાજ, કાશ્મિરા, નૌશીર, પિનાજ, જંગલવાલા, પોરસ, ડૉ. બુર્જર બાનાજી, ડૉ. અર્દેશર જાગોશ, તમે બધ્ધાને પતેટી મુબારક.

समर्थ आज पोरके झाले.

अशोक "समर्थ" आज पोरके झाले. चेतननी आता कोणावरच्या अन्याया साठी लढायचे ? आसुड कोणावर उगारायचा ? समर्थांचे पुनरागमन आता व्हायचे नाही. आता आम्ही कशाने भयभीत व्हायचे ?
अंधाऱ्या बखळीमधल्या, तळघरातील त्या दुष्ट शक्ती देखील आज रडवेल्या झाल्या असतील, हवालदील झाल्या असतील. चंद्राची काळी सावली आता कोणाला ग्रासणार ?

नारायण धारप गेले. अजुनही ही अशक्य कोटीतली बाब वाटत आहे. त्यांच्या अजरामर भयकथेप्रमाणे, विज्ञानकथेप्रमाणे नारायण धारपही अमर असतील असा माझा समज. गेले कित्येक वर्षे त्यांच्या कथेनी पछाडलेला मी. एके काळी भारावल्यागत त्यांनी लिहीलेली पुस्तके वाचुन काढली , त्यांची पारायणे केली.

नारायण धारपांना भेटण्याची इच्छा होती. पण भेटणे काही झालेच नाही. आज आपल्या जवळाची, जिव्हाळ्याची एक व्यक्ती गमावल्याचे दुःख झाले आहे.

भयकथा हा नवा साहीत्यप्रकार नारायण धारपांनी मराठी साहित्यात रुजवला, वाढवला.
फायकसची खरी अखेर आज झाली.

Sunday, August 17, 2008

श्रावणातच वेध लागले गौराईचे , हरताळीकाचे




एक दिवस वांग्याचा






सक्काळी सक्काळी उठल्या उठल्या राजाभाऊंनी ब्लॉगच्या दुनियेची मुशाफिरी सुरु केली. पहिलीच पोष्ट डाळवांग्यावरची वाचली. http://vadanikavalgheta.blogspot.com/2008/08/eggplant-daal.html
तेव्हा कुठे ठावुक होते, आज दिवसभर वांगीच दिसणार आहेत ?
मंडईत गेलो तेथे वांगी, पहिल्यांदाच फक्त वांगी विकणारे विक्रिते पाहीले, दुर्वांकुर मधुन जेवण घरी आणाले त्यात पण वांग्यांची भाजी.
अरे देवा. नशीब बायकोने सकाळी कांदे पोहे केले, वांगी पोहे नाहीत.

जब जब फुल खिले, तुझे याद किया हमने



यंदाला कारवी फुलली आहेत असे ऐकीवात आहे. मंगळवारी एका धनगरपाड्यात जाणार आहे

माझी श्रावण खाद्ययात्रा - ऐरोळी



Saturday, August 16, 2008

महागाई संगे युद्ध आमचे सुरु, खरेदी करु, खरेदी करु आणि खरेदी करु

स्वातंत्र दिनाचे औचीत्य साधुन समस्त पुणेकरांनी अखिल भारतीय स्तरावरचा नवीन लढा सुरु केला आहे, महागाईच्या विरुद्ध, बिगबाजारच्या सहाय्याने.

काल रात्री अगदी उशीरा पर्यंत पुणेकर शांतपणे रांगेत उभे होते, बिगबाजारच्या बाहेर, खरेदी करण्यासाठी, महाबचत योजनेचा लाभ घेण्यासाठी.
या स्वातंत्र दिन कोणाला कसा भावतो व फळतो हे सांगणे मुश्किल आहे.
या निमित्ते लोकांच्या भावनेवर आरुढ होवुन ही नवी मॉल संकॄती आपले उखळ भरुन घ्यायला शिकली आहे. सर्वत्र सेल चा सपाटा सुरु आहे, कोणी ४० टके, कोणी ६१ तर कोणी अगदी ७० टक्के सुट देणार आहे.

ता.क. राजाभाऊंनी सुद्धा काल या वाहत्या गंगेत आपले हात धुवुन घेतले. नगररोड वरच्या सेंट्रल मॉलमधे, मुलासाठी म्हणुन खरेदी करायला गेले, मुलगा राहीला दुसरीकडे, स्वःतासाठी चांगली पाच शर्टे घेवुन स्वातंत्रदिन साजरा करुन राहीले.

आज चंद्रग्रहण.



आज चंद्रग्रहण.


चंद्र आणि सागर याचे अतुट नाते. जसे चंद्रामुळे सागराला उधाण येते तसे आज या चंद्रग्रहणाच्या निम्मीत्ते बातम्यांच्या वाहीनींना आणि जोतिष्यांना उधाण आले आहे. बातम्या देणाचे आपले काम सोडुन या वाहीन्या भलतीसलती कामे करुन राहीली आहेत.


ग्रहणे , एक साधी सोपी खगोलीय घटना. पण त्या बद्द्ल समाजात किती गैरसमज आणि त्यात अंधश्रध्याळुंच्या मनात भिती निर्माण करण्याची कामे ही पोटभरु मंडळी करत असतात. आज तर कहरच झाला. बहीणीने भावाला राखी केव्हा बांधायची हे सुद्धा हि लोक सांगु लागली आहेत.


या आपल्या बेजबाबदार उद्योगाने आपण समाजाला कोठे घेवुन चाललो आहोत याचेही भान ही मंडळी विसरली आहेत.

कशी गंमत केली !

त्या डायटॆशीयनची म्हटले जराशी गंमत करुया.

- माझी वजन कमी करण्याची इच्छा आहे काय आहार घेवु ?

- अमुक तमुक खा वगैरे वगैरे

- मी व्हिगन आहे. व्हिटॅमीन B१२ च्या कमतरतेसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करु. ( गुगली )

- तुम्ही दुध घ्या, पनीर चा वापर करा, अंडी पण खावु शकता.

- सपशेल नापास.

एका प्रख्यात औषधे बनवणाऱ्या कंपनीनी काही महिन्यापुर्वी एक प्रामुख्याने डायबेटीस व हृदयरोग आदी विषयांवर एक नेहरु सेंटर मधे शिबीर आयोजीत केले होते. त्यातला हा किस्सा.

व्हिगन जिवनशैली बद्द्ल अजुनही आपल्या कडॆ अज्ञानच आहे अगदी वैद्यकीय क्षेत्रातील माणसांनी मला व्हीगन डायट म्हणजे काय ? हा प्रश्न विचारला आहे.

पाणीच पाणी चहुकडे




काही दिवसापुर्वी राज्यावर पाऊस नसल्यामुळे दुष्काळाचे सावट होते आणि आता . यंदाला पाऊस मुबलक झालाय बर का.


खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे जेव्हा पाणी सोडण्यासाठी उघडले जातात ते दॄष्य न्याहाळणे हा एक आनंद सोहळा असतो.
काल जायला जरा अंमळ उशीरच झाला.

Friday, August 15, 2008

मुलगा झाला हो

"मला मुलगा झाला" हे सांगतांना त्या गॄहस्थांचा चेहरा नुसता आनंदाने फुलुन आला होता. मग मी ही त्याच आनंदाच्या सुरात त्यांचे अभिनंदन केले.
पण , पुढचे त्यांचे वाक्य ऐकताच मी गप्प झालो.
"आधी मला तीन मुली आहेत. मुलीच्या पाठीवर हा मुलगा झाला."
धन्य.
यांना बायका म्हणजे मुलगा काढण्याचे यंत्र वाटतात की काय ? मुलगा होई पर्यंत उत्पादन सुरु.
नशीब " तॄप्ती " हे नाव मुलांच्या मधे नाही. नाही तर तेच नाव कुलदिपकाला ठेवले असते.

झेंडावंदन समारंभ


स्वातंत्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदन समारंभ संबंधी असणाऱ्या अनस्थेबद्द्ल श्री. आनंद घन यांनी अप्रतिम लेख लिहीला आहे. http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_1603.html


आमच्या भल्या मोठया सोसायटीत मोजकीच झेंडा वंदनाला केवळ १०-१२ जणांची उपस्थिती होती. त्यात सुद्ध्या केवळ जेष्ठ नागरीकच प्रामुख्याने होते.


कस व्हायच.
स्वातंत्र दिनाच्या दिवशी होणाऱ्या झेंडावंदन समारंभ संबंधी असणाऱ्या अनस्थेबद्द्ल श्री. आनंद घन यांनी अप्रतिम लेख लिहीला आहे. http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_1603.html


आमच्या भल्या मोठया सोसायटीत मोजकीच झेंडा वंदनाला केवळ १०-१२ जणांची उपस्थिती होती. त्यात सुद्ध्या केवळ जेष्ठ नागरीकच प्रामुख्याने होते.


कस व्हायच.

तंटामुक्त मंत्रीमंडळ

१५ ऑगस्ट २००८ पासून राज्य शासन महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम सुरू करीत आहे. गावातील तंटा गावातच मिटवा आणि गावाला बक्षिसही मिळवा.

अरे वा मस्त योजना आहे.
पण आता ही योजना आपल्या मंत्रीमंडळाला देखील लागु करायला हवे नाही का ? नेहमी बघा कसे आपापसात भांडतच असतात, राजीनामे सादर करत असतात. .

झेंडा उंचा रहे हमारा


झेंडा उंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा

कोण दोषी ?


कोण दोषी ? ही दुचाकी चालवणारी शाळेतली मुले की यांच्या हातात दुचाकी देणारे किंवा कानाडोळा करणारे यांचे आईबाप ?

हे ही बालकामगारच


स्वातंत्र

स्वातंत्र काय फक्त मानवालाच हवे असते ?

आज १५ ऑगस्ट. स्वातंत्रदिना निमित्र हार्दिक शुभकामना

Thursday, August 14, 2008

लिंबाचे गोड लोणचे

श्रावणात लिंबाच्या गोड लोणाच्याची चव काय आगळीच लागते. वालाचे बिर्डे , मुगाचे बिर्दे आणि लिंबाचे गोड लोणचे . गोड आप्पे, ऐरोळी, अळुवडी अहाहा.

स्वातंत्राची साठ वर्षे

अजुनही आपण या बालकांच्या समस्या सोडवु शकलो नाही आहोत.

काय राजाभाऊ

काय राजाभाऊ, "ते" पक्ष सोडुन जाणार तर। या कोँग्रेस संस्कृतीत त्यांचे मन फारसे रमणे कठिणच म्हणायचे

अच्छा लगता है

आधी सांयकाळी घरी परतलो की एकच कार्यक्रम असायचा । संगणकासमोर बसायचे, ब्लॉग उघडुन त्यात रमुन जायचे। बायको आहे, मुलगा आहे याचे भान विसरायचे , पण आता,
वजन कमी करायास ठरवल्यापासुन सांयकाळ एकतर चालण्यात तरी जाते नाही तर कार्यालयातील सुसज्ज जीम मधे तरी। त्या मुळे मग म्हणावेसे वाटते "अच्छा लगता है "
कार्यालयात शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी एवढ्या सुखसोयी असतांना त्यांचा उपभोग न घेणारा मी कपाळकंरंटाच म्हणायचो।

अपमान घोर अपमान

आज म टा ने समस्त भारतावासियांचा अपमान केला आहे।

ऑलिंपिक वर भाष्य करतांना ते म्हणतात " भारत एक सेंकंदाने पुढे जातो तेव्हा जग अख्या मिनिटाने पुढे सरकलेले असत "

चुक साफ चुक,

आपली मोजण्यात चुक झाली आहे। वेळ अर्धा सेंकंद असावा ।

Tuesday, August 12, 2008

राज्यपालपद

राजकारणी व्यक्तीची राज्यपालपदावर नेमणुक केली जावु नये। या पदावर ते फारसे रमतांना दिसत नाही।
मस्त पैकी गिरिस्थानावर थंड हवा उपभोगायची सोडून ते वारंवार आपल्या राज्यात काहीना काही कारणांनी परतुन येत असतात।

भटक्या कुत्र्यांना याद राखा खायला घालाल तर

मुंबई महानगरपालीकेने एक तुघलकी निर्णय घेतला आहे । भटक्या कुत्र्यांना खायला घालाल तर तुम्हाला ५०० रुपये दंड होवु शकतो।
धर्मं सांगतो भुतदया दाखवा, मनपा सांगते याद राखा भटक्या कुत्र्यांना जगवाल तर ।
हे विश्व केवळ आपल्या सर्व मानव जातीसाठीच रहायला आहे हा जो मानवाचा गैरसमज आहे त्यातून हे असे निर्णय घेतले जातात।
एखाद्याला कुत्रा चावला तर टी मोठी बातमी होते , गावात बिबट्या शिरला तर त्याला शेकडो जण मिळुन मारून टाकतात, पण मानवाने आजपर्यंत किती जातिप्रजाती आपल्या मुर्खापणामुळे, हव्यासापायी नाहिश्या केल्या त्याची मोजदात सुद्धा ठेवली जात नाही।
एका वर्तमानपत्राने तर भटक्या कुत्र्यांना खायला घालणारया महिलेस चक्क मानसिक रूग्ण बनावुन टाकल आहे।

दहीहंडी आणि लहान मुले

दहीहंडी फोडण्यासाठी सर्वात वरच्या थराला वजनाने कमी असल्यामुळे लहान मुलांना चढवले जाते जे अत्यंत धोकादायक असुन यात मुले खाली पडुन जायबंदी होण्याची शक्यता असते।

त्वरीत या लहान मुलांचा असा वापर थांबावला जावा

Monday, August 11, 2008

जिंकलो रे

अभिनंदन अभिनव बिंद्रा चे । आज भारताने पाहिले सुवर्ण पदक जिंकले।

Sunday, August 10, 2008

काम करतांना मन ताजे, प्रफुल्लीत रहाण्यासाठी


आग प्रतिबंधक साधने

इमारती मधे नुसतीच आग प्रतिबंधक साधने ठेवुन , देवुन चालत नाही तर सुरक्षततेसाठी ती सदैव सुसज्ज अवस्थेत ठेवावी लागतात.

नाहीतर त्याची अवस्था ही अशी होती.

नशा सुरांची - जोहराबाईंच्या आवाजाच्या जादुची


या श्रावणातील पावसाळी मदहोशी वातावरणात "नशा" हवीच. कोणाला नशेसाठी सुरे च्या आहारी जावेसे वाटते तर माझ्यासारख्या दिवाण्याला सुरांची नशा हवेहवेशी वाटते.

सुरांनी भारावुन जायला या धुंदभुंद वातावरणात कोणाला ऐकायचे ? कोणती गाणी ऐकायची हे त्या त्या वेळेच्या मनाच्या तरल अवस्थेवर काहीसं अबलंबुन असते. कधी नुरजंहाशी जवळीक साधावीशी वाटते "आ घटा काली घाटा अबके बरस ना बरस , मेरे प्रितम परदेश " तर कधी लता रुलावुन जाते.

लेकीन आज मन बडा जिद कर रहा था "जोहराबाई अंबालावाली" ची गाणी ऐकण्याची. एकापेक्षा एक अनेक सुरेल गाणी त्यांनी गायली आहेत.

सामने गली मे मेरा घर है, पता मेरा भुल ना जाना - मिर्झा सायबान
सुनोजी प्यारी कोयलीया बोले - संन्याशी
चले गये चले गये दिल मे आग लगाने वाले चले गये - पहले आप
मोरी बाली उमरीया - नतीजा
कौन जीवन मे मेरे - हमारा संसार.
हे झाले मनाचे चोचले.
य रंगील्या माहोल मधे मग कधीतरी "कांद्याची भजी " होवुन जावु द्या ही फरमाईश करावी लागते.

पुण्यातील मराठी माणसे

पुण्यातील मराठी माणसे एकदम हिंदीतुनच बोलायला सुरवात का बरे करतात ?

दुकानांवरील पाट्या मराठीतच हव्या ?

दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या प्रथमदर्शनी पाट्या मराठीतच लिहायला हव्या या मागणीने सध्या जोर पकडला आहे.

पाट्या मराठी भाषेत लिहील्या जाव्यात का देवनागरी लिपीत ? हे ठरवणे जरा पंचाईतीचे झाले आहे

"BIG BAZZAR" हे "बिग बाजार" म्हणुन लिहावे का "मोठा बाजार " ?
"SHOPPERS STOP " म्हणजे "शॉपर्स स्टॉप" की "खरेदीकरांचा थांबा ?
"Reliance Fresh " की " ताजा रिलायंस" ?
"WEST SIDE " - "वेस्ट साईड " की " पश्चिम बाजु "

आणि "मॉल" म्हणजे "मॉल" च लिहायचा काय ?

या आशयचे एक अप्रतिम पत्र लोकसत्ता मधे प्रसिध्य झाले होते. मुळ कल्पना ही त्या पत्रलेखकाची. त्याच्या मुद्देसुर लिखाणावर मी बेहद्द खुश झालो आहे.

दे धक्का !!!: प्यार का PC...#c4941096504328668766

झक्कास,

काय मस्त लिहीलय सुनील जाधवांनी.

मान गये उस्ताद.

दे धक्का !!!: प्यार का PC...#c4941096504328668766

बेडेकरांच्या मिसळीचा पुन्हा एकदा दणाका

बेडेकरांची मिसळ खाण्याचा योग या जन्मी तरी दिसत नाही.
व्यावसाईक आपला व्यवसाय जोरात चालावा यासाठी अनेक कारणे , मार्ग शोधत असतात, तर बेडॆकर मला वाटते आपले उपहारगॄह बंद ठेवण्यासाठी.
"पाणी संपल्यामुळे आज आमचे दुकान बंद राहील "
बेडेकरांकडे मिसळ खाण्यासाठी जाण्याची व बंद दुकान किंवा "संपली’ हे ऐकुन परत येण्याची ही सहावी वेळ.

बाल कामगार



बालकांकडुन कामे करुन घेण्यास कायद्याने मनाई असली तसेच मानवतेच्या दॄष्ट्रीकोनातुन मुलांना राबवुन घेणॆ कितीही चुकीचे असले तरी हाउसींग सोसायट्यांमधे लहान मुलांना सर्रास कामाला जुंपले जाते.
वर्तमानपत्रे , दुध घरपोच करण्यासाठी, गाड्या धुण्यांसाठी आदी कामे बालकांकडुन करवुन घेतली जातात, कारण एकच या शोषणासाठी फार कमी पैसे मोजावे लागतात.


Saturday, August 09, 2008

जुना बाजार


बॅगेची खरेदी चाललीय वाटत ?

३००० कोटी ते ३०० कोटी

राजाभाऊ, राजकारण मोठे गहन हो।

३००० कोटी ची जमीन केवळ ३०० कोटीला खैरात करण्याचे घाटत आहे आणि केवळ राणॆ सरकार एकटॆच त्या साठी राजकारणाच्या खेळीत सर्व पणाला लावत आहेत। इतर मंडळी मजा बघत आहेत।

गरीब , भुमीहीन, रहाण्यासही जागा नसलेल्या गोरगरीबांना कधी सरकार अशी जमीन का बरे दान देत नाही ? केवळ श्रीमंतानांच दान का बरे केले जाते ?

Friday, August 08, 2008

ऑलिंपिक

आता पुढील काही दिवस ऑलिंपिक फिव्हर असेल , मग दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे चर्चा सुरु होईल, भारत एक महासत्ता, महाकाय देश, पण ऑलिंपिक मधे पदके मिळवु शकत नाही, का , कसे, काय करायला हवे, होते इ.इ।
मग ऑलिंपिक संपेल, चर्चेला पुर्णविराम मिळेल, ते पुढील ऑलिंपिक पर्यत।
मधल्या काळात येरे माझ्या मागल्या ।
५० खेळाडु व २०० औफिसिअल्सचा ताफा .

आज ०८-०८-०८ आणि वजनाचा काटा ८० ला टच

काल अस्म्मादिक चक्क बस पकडण्यासाठी चांगलेच अंतर धावले। सहा - सात महीन्यापुर्वी ही एक अश्यक्य कोटीतली घटना होती ।
९२ किलोचे धुड , हले दुले , गजगती चाले , साधे चालतानाही धापा लागायची मग धावणे तर दुरच।
हे परिवर्तन घडलेच कसे ?
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे। पण हे करायचे असते ते कोणीतरी सांगायला हवे व कसे करायचे तेही।
हे काम केले दोन ब्लोगर्सनी। वैशाली आणि संगीतानी, त्यांची प्रेरणा व मार्गदर्शन।
भरपुर चालणे व ह्विगन आहाराशैली यांनी अखेर कमाल करून दाखवलीच ।
एक जमाना असा होता वाढलेल्या वजनाबरोबर मिळालेल्या सर्व व्याधि मागे लागल्या होत्या , सदैव दुर्मुखलेला, कंटाळलेला, नैराश्येने पछाडलेला, नकारात्मक विचाराने भारलेला, सारे मानसिक रोग , शारीरिक व्यथा घेवुंन रडत रखड्त दिवस पार होत होते ।
पण आता
आयुष्य किती सुंदर आहे।

Thursday, August 07, 2008

प्रदर्शन व विक्री रेशीम हातमाग वस्त्रे

सद्ध्या एक छानस प्रदर्शन भरलय , वल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे , रेशीम हातमाग वस्त्रे , साडया, ड्रेस मटेरियल , आदीच।

गढ़वाल, धरमावरम, पोचमपल्ली, मुंगासिल्क , टसर, कांथा , मदुबनी प्रिंट्स, कोसा सिल्क, पटोला, चिंतामणि, चंदेरी, महेश्वरी, पैठनी, बोमकाई , संबलपुरी, कांजीवरम, तनछोई, जमदानी, बालुचारी, काय मागाल ते हजर आहे, सबंध भारतातुन येथे व्यापारी आले आहेत उत्मम साडया विकायला, त्यात परत विकास आयुक्त, (हातमाग) वस्त्र निर्माण मंत्रालय, भारत सरकार यांनी हे प्रदर्शन भरवले असल्यामुळे रेशमाची ही खात्री आहे।
जर का माझ्या बायकोला कळल की मी हे प्रदर्शन बघायला गेलो होतो तर मग " काण्या खल्लास "

Saturday, August 02, 2008

अस्सा सुरेख चवदार श्रावण ग बाई


श्रावण मास ! हर्ष काय फक्त मनीच दाटतो होय ? या दिवसात खाद्यपदार्थांची नुसती लयलुट असते। जिव्हा सकट सारी पंचेद्रिय कशी सुखावली पाहिजेत।

पहिला श्रावण शनिवार। ऐरोळी, मुगाचे बिर्डे, तुरीची दाल व हळद घातलेला पिवळा बासमती तांदळाचा भात , गोड लिंबाचे लोणचे, चटणी, नारळाच्या दुधातले केळे, नारळाची चोय घातलेली वटाणा बटाटा भाजी ।

बस और क्या चाहिये जीने के लिए ?


(ता.का। सासुबाईंचा ओरडा खावा लागायाचा तो लागलाच। मुगाचे बिर्डे हे श्रावणी सोमवारी करायचे असते शनिवारी नाही । )

Friday, August 01, 2008

सूर्यग्रहण

आज सूर्यग्रहण होते । एक साधी सरळ खगोलीय घटना। पण या निम्मिते अनेकांना चेव चढतो, मग लोकाच्या अंधश्रद्धाशी त्यांचा खेळ सुरु होतों।

नेमका ग्रहण बघायचा चश्मा घरी राहिला व एका सुंदर दृष्याला मी आज मुकलो।

http://batmidar.blogspot.com/2008/07/blog-post_31.हटमल यांनी फार चांगल लिहिले आहे या विषयी

हार्दिक अभिनंदन डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे यांचे







महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात माडिया गोंडांसाठी रुग्णालय आणि शाळा चालविणाऱ्या डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे या दांपत्याला यंदाचा प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार आज जाहीर झाला