Tuesday, August 19, 2008

समर्थ आज पोरके झाले.

अशोक "समर्थ" आज पोरके झाले. चेतननी आता कोणावरच्या अन्याया साठी लढायचे ? आसुड कोणावर उगारायचा ? समर्थांचे पुनरागमन आता व्हायचे नाही. आता आम्ही कशाने भयभीत व्हायचे ?
अंधाऱ्या बखळीमधल्या, तळघरातील त्या दुष्ट शक्ती देखील आज रडवेल्या झाल्या असतील, हवालदील झाल्या असतील. चंद्राची काळी सावली आता कोणाला ग्रासणार ?

नारायण धारप गेले. अजुनही ही अशक्य कोटीतली बाब वाटत आहे. त्यांच्या अजरामर भयकथेप्रमाणे, विज्ञानकथेप्रमाणे नारायण धारपही अमर असतील असा माझा समज. गेले कित्येक वर्षे त्यांच्या कथेनी पछाडलेला मी. एके काळी भारावल्यागत त्यांनी लिहीलेली पुस्तके वाचुन काढली , त्यांची पारायणे केली.

नारायण धारपांना भेटण्याची इच्छा होती. पण भेटणे काही झालेच नाही. आज आपल्या जवळाची, जिव्हाळ्याची एक व्यक्ती गमावल्याचे दुःख झाले आहे.

भयकथा हा नवा साहीत्यप्रकार नारायण धारपांनी मराठी साहित्यात रुजवला, वाढवला.
फायकसची खरी अखेर आज झाली.

No comments: