Tuesday, August 12, 2008

भटक्या कुत्र्यांना याद राखा खायला घालाल तर

मुंबई महानगरपालीकेने एक तुघलकी निर्णय घेतला आहे । भटक्या कुत्र्यांना खायला घालाल तर तुम्हाला ५०० रुपये दंड होवु शकतो।
धर्मं सांगतो भुतदया दाखवा, मनपा सांगते याद राखा भटक्या कुत्र्यांना जगवाल तर ।
हे विश्व केवळ आपल्या सर्व मानव जातीसाठीच रहायला आहे हा जो मानवाचा गैरसमज आहे त्यातून हे असे निर्णय घेतले जातात।
एखाद्याला कुत्रा चावला तर टी मोठी बातमी होते , गावात बिबट्या शिरला तर त्याला शेकडो जण मिळुन मारून टाकतात, पण मानवाने आजपर्यंत किती जातिप्रजाती आपल्या मुर्खापणामुळे, हव्यासापायी नाहिश्या केल्या त्याची मोजदात सुद्धा ठेवली जात नाही।
एका वर्तमानपत्राने तर भटक्या कुत्र्यांना खायला घालणारया महिलेस चक्क मानसिक रूग्ण बनावुन टाकल आहे।

No comments: