Saturday, April 19, 2014

कैरीचे पन्हे आणि आंबा डाळ

कैरीचे पन्हे आणि आंबा डाळ

याच साठी चैत्र यावा.

प्रिय अशोक

"रोज तीन वेळा चाला , सुरवातीस दहा मिनिटे का होईना पण चाला "

आठवडा झाला पण धडके चालणॆ सुरु करायला राजाभाऊंना मुहुर्त मिळेनासा झाला होता.
आज पहाट. जडवलेल्या शरीराने का चालणे नको ह्याची शंभर कारणे सांगायला सुरवात केली.

मग राजाभाऊंनी एक शक्कल लढवली. कॅमेरा बाहेर काढला. खांद्याला अडकवला.

पाच मिनिटात घराबाहेर. आज सीरी ची वाट . म










चे रुप न्हाहाळण्यास.

किती वाहु पांडुरंगा संसाराचा भार.

किती वाहु पांडुरंगा संसाराचा भार.
हे रडगाणॆ आता नको

कारण अब की बार येणार ..........

ओटस

आता रोज सकाळी उठल्यावर मनाला बजावुन सांगावे लागते "ओटस " किती मस्त लागतात ते.

सत्तेविना होतील कासावीस

एकवीस , बावीस, तेवीस, चोवीस
काही नेते मंडळी हरल्यावर आता सत्तेविना होतील कासावीस

पंचवीस, सव्वीस, सत्तावीस, अठ्ठावीस
खासदारकी गेल्यावर येतील आता वाईट दीस

कितनी बार

"कितनी बार तुम्हे बोलु, तुम वही गलतीयां कर रहे हो बार बार "

"माफी चाहता हूं सर, नही होगी ऐसी गलती अगली बार "

वरिष्ठ आणि कनिष्ठांत असा संवाद घडु लागला की समजावे दोघांना ज्वर चढलाय.

बार बार आणि बार

राजाभाऊ आपल्याच बायकोला घेवुन लॉग ड्राईव्हला निघाले.
संपुर्ण प्रवासात बोलण्यात विषय कसला तर, बार बार आणि बार बार चे यमक जुळवणे.

वेड लागायची पाळी आलीय, ह्या जाहिरातींनी. तरी बरे हे आपल्यावर थोडाच वेळ आदळत असते. पण थोडासा वेळ पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर जर का हि स्थिती होत असेल तर चोवीस तास "व्हर्च्युअल" प्रेरणा केंद्रात काम करणाऱ्यांचे काय होत असेल ?

आनंदी आनंद गडे,

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, 
वायूसंगे मोद फिरे नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला मोद विहरतो ...

त्यांचे किस्से

खरं सांगायचे म्हणजे हल्ली मोठ्या लोकांची उदाहरणे , त्यांचे किस्से , त्यांचे बोलणे नकोसे झाले आहे. 

आयुष्यभर तेच तेच. आणि काही ठरावीक लोकांचे किस्से सांगण्यापलिकडे आपण अजुन ही जात नाही आहोत, जणु दुसरे कोणीच नाही.

रेबॅनचा गॉगल.

तरुणपणी अपेक्षा तश्या माफकच होत्या. 
रेबॅनचा गॉगल, रॅंगलर्सची जिन्स. रिबॉकचे शुज आणि कॉकोडाईलचे टी शर्ट. 

परिस्थितीपुढे त्या पुऱ्या होणे राहूनच गेल्या.

आज मुलांनी आपल्या बापाची त्यातली एक इच्छा पुर्ण केली. येवु घतलेल्या त्याच्या लग्नाच्या गद्धेपंचवीशीसाठी.

रेबॅनचा गॉगल.

पैसे, वस्तु आदींचे वाटप

आपल्यालाच मत द्यावे ह्यासाठी मतदारांना पैसे, वस्तु आदींचे वाटप होते असे नुसतेच ऐकुन आहे.

हापुस रत्नागिरीका है

"हापुस देवगडका है "

हे आंबे कुठले असे असा ग्राहकाने विचारले की त्याला एकच उत्तर देणाऱ्या समस्त भय्येमंडळींनी आता जागा बदलली आहे

हल्ली ते सांगतात 

"हापुस रत्नागिरीका है "
ह्याच निवडणुकीत कोणाला मत द्यायचे ह्या विषयी मनात महाप्रचंड गोंधळ उडला आहे.
रोजच्या रोज काहीना काही वाचुन, काहीना काही पाहुन, ऐकुन मत बदलत असतं.

काल लालबाबटेवाल्यांची १५-२० माणसे असलेली प्रचंड प्रचारफेरी पाहिली. 

कोणीतरी यांना मत द्यायला हवे हा विचार प्रबळ झाला आहे.

चित्रा-चंद्राचे दांपत्य

चंद्र रोहिणीप्रमाणॆच चित्रेशींही अगदी निकट सहवास करतो. म्हणजे चित्रा ही सुद्धा त्याच्या आवडत्या रमणींपैकी एक धरायला हरकत नाही. रोहीणी आरक्त तर चित्रा किंचींत हरिता. दोघीही आपापल्यापरी मनमोहिनी. चित्रा-चंद्राची युती मी अनेकवार पाहिली आहे. एखाद्या वेळी तिचा पती क्षीण हिऊन तिच्या घरी येतो आणि ती जणू "नीचैर्गच्छत्पुपरी च दशा चक्रनेमित्रमेण " या शब्दांनी त्याला धीर आणि आश्वासन देते. ज्या वेळी तो सकल कलांनीं संपन्न होऊन तिला जवळ करतो, त्या वेळी ती वल्लभा बनून त्याच्याशी खेळीमेळी धरते.

चैत्र पोर्णिमेला होणाऱ्या चित्रा-चंद्राच्या समागमाचा दृष्टांन्त घेऊन दिलीप-सुदक्षिणेचा गौरव करतांना त्या रसिकावतंस कालिदासाने जो श्लोक लिहिला तो संस्कृत वाड्ग्माला भूषणभूत असा आहे

दिलीप आणि सुदक्षिणा. दोघेही एकाच रथातून जाणारी. दोघांचाही शुद्ध वेष. जणू हिमवृष्टीतून मुक्त झालेले चित्रा-चंद्राचे दांपत्य. त्यांची शोभा वर्णायला शब्द कुठून आणायचे !

"नक्षत्रलोक " पं. महादेवशास्त्री जोशी .

गुप्त मतदान.

गुप्त मतदान.

आपण कोणाला मत दिले हे कोणी सांगु नये.

तुम्ही कोणाला मत दिलेत हे कोणी विचारु नये.

एक मात्र खरे , जुने ते सोने

जशी जशी मत देण्याची , कोणाची तरी एकाची निवड करण्याची घडी जवळ येवु लागली तशी तशी राजाभाऊंच्या मनाची चलबिचल फार वाढायला लागली.

नवे की जुनेच ? जुनेच का नव्यात आणखीन कोण ? जुन्याचा आलेला कंटाळा, नव्यांना जवळ करायचे धाडस होत नाही. डावीकडे वळावे की उजवीकडे , निर्णय होता होत नव्हता.

मग पुर्ण विचाराअंती राजाभाऊ जुन्याकडे वळले. 

निवड करायची होती अंम्बा भवन व रामाश्रय मधे. 

रामाश्रयमधे सकाळी अफाट गर्दी असते, प्रामुख्याने गुजरातींनी हा भाग काबीज केलेला , मग तेथे जाणे नकोशे व्हायला लागले होते. सगळा गडबड गोंधळ, आरडाओरडा.

पण आजची वेळ दुपारची होती, त्या मानाने गर्दी तशी माफकच असणार करत मग राजाभाऊ येथे नीरडोसा खायला गेले.

गरमागरम रसम, वाटीभर. नीर डोसा. पायनापल शिरा आणि ऑनीयन रवा डोसा. शेवटी कापी.

अखेरीस एक मात्र खरे , जुने ते सोने.आपले नेहमीचेच बरे. आपले ते आपलेच.

गद्धेगाळ

आपल्याला मुंबईची बऱ्यापैकी माहिती आहे हा राजाभाऊंचा भ्रम तसा अनेक वेळा नाही म्हटले तर दूर होत असतो. पण शेवटी भ्रम तो भ्रम.

आज भटकतांना एक देऊळ त्यांच्या पहाण्यात आले. "श्री कामनाथ महादेव मंदिर " मग ते आत गेले. येथे शिवलिंगावर चारीबाजुने शंकराचे चेहरे कोरले आहेत.

मग तेथुन पिंपळेश्वर महादेव. 

गद्धेगाळ पहायला. 

परवाच्याला मोकाशी मॅडमनीं आपल्या व्याख्यानात या विषयी सांगितले होते. 

या पिंपळेश्वराजवळुन जाता जाता आयुष्य गेलेले, पण येथे काय असे असेल हे ठावुकच नव्हते.