Tuesday, March 18, 2008

वॉर्ड




आता रुग्णाच्या समोरच आलेल्या पाहुण्यांनी तिला झालेल्या आजारपणाची सखोल चौकशी करणे म्हणजे जरा अतीच झाले. समोरच्यांची तारांबळ. जे काही विचारायचे आहे ते खोली बाहेर आल्यावर विचारांना.



भरीस भर म्हणजे घरचे बहुतेक सर्व तापाने आजारी, मला तीन दिवस ताप, वडीलांना ताप , सगळी गंमत जंमतच चालली आहे.




आज रात्रपाळी करायची माझी पाळी. रुग्णालयात दिवस कसातरी निघुन जातो, पण रात्र नुसती खायला उठते, वेळ जाता जात नाही. परत काही वाचायला नेले तर वाचनही होत नाही. जानेवारी पासुन सुरु झालेला हा खेळ कधी बरा संपायचा आहे ? एकदा ती बरी होवुन घरी परतली की देव पावला.



कस व्हायच ?

2 comments:

Vaidehi Bhave said...

namaskar harekrushnaji,
baryach divasanni aaj me marathiblogs varti gele tithe tumchya blog var click kele teva kalle tumchi aai sadhya rugnalayat dakhal ahet. kharach khup vait vatle.. tya barya houn lavkarat lavkar ghari yetil ya shubheccha.

HAREKRISHNAJI said...

thanks, vaidehi