Thursday, March 06, 2008

आयसीयु रात्र

भाक्रानंगल, चंदीगड, कसौली, सिमला,कुलु, मनाली. सर्व जागांवर झालेली हॉटेल्सचे, वाहनाचे, रेल्वे चे आरक्षण शेवटी रद्द केली, छोकऱ्याची बारावीची परीक्षा संपल्यासंपल्या त्याच्या श्रमपरीहार्थ सफरीचा मोठा बेत आखला होता. आले देवाजीच्या मनी.

सबंध आयुष्यात रुग्णालयात घालवलेली ही कालची कितवी रात्र देव जाणे. लहानपणापासुन रुग्णालयाची सवयच होवुन गेली आहे. बर प्रत्येक वेळी अवस्था गंभीरच. मी स्वःत, घरातील सर्वच जण, मॄत्युला भोज्या करुन आलेले. जवळचे नातेवाईक, शेजारी यांच्यासाठी देखील रुग्णालयात मी रात्री जागवल्यात. तेव्हा फारसे विशेष जाणवत नाही. पण आता हळु हळु चाळीशीत त्रास होवु लागला आहे.
त्यात रात्री येथला एक रुग्ण अल्लाला प्यारा झाला, दुसरा सिरीयस झालेला. मग त्यांचे भरपुर नातेवाईक वर आयसीयुत आलेले. झोप काही लागेना, मध्यरात्री पर्यंत खाली रस्तावर उभा राहुन टाईम पास करत उभा राहीलो. जुने हिंदुजा कॉलेजचे दिवस आठवत. या जागी ईराणी होता, चहाचा एक प्याला घेवुन रंगलेल्या चर्चा, वादविवाद. फुकटचा मराठी माणासांच्या नेत्यांच्या नादाला लागुन विद्यार्थी नेता बनुन भाईगीरी करण्याऐंवजी प्रामाणीकपणे अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले असते तर ?

वर गेलो, हॉल मधे बऱ्याच जणांचे मोबाईल वर मोठमोठयाने एकाच वेळी बोलणी सुरु होती. बाहेर रडारड, आरडाओरडा.

मग ओशोनी सांगीतलले आवाजाचे ध्यान करायला सुरवात केली, प्रत्येक आवाज वेगवेगळा ऐकायला सुरवात केली. एका वेळी आपण केवढे आवाज ऐकत असतो ! कधीतरी झोप लागुन गेली ती शेजाऱ्यांच्या घोरण्याच्या आवाजाने जाग ऐण्यासाठी.

1 comment:

Nandan said...

harekrishnaji, tumachya aaeechya prakrutila lavkarach utar pado ashee prarthana karato. Tumha saryannach ha awaghad kaal nibhavoon nyayache bal milo.