Wednesday, March 05, 2008

चकाचक मुंबई

मुंबई व दिल्ली या दोन्ही शहरांचा जगातील सर्वात गलिच्छ २५ शहरामध्ये समावेश असल्याची बातमी वाचुन आनंदाने उर भरुन आला.
हा सन्मान मुंबईस मिळविण्यासाठी ज्याचें ज्यांचे हातभार लागले आहेत त्यांचे सर्वांचे मनपुर्वक आभार.
जगामधे मुंबईस गलिच्छ शहरांच्या क्रमात सातवा क्रम मिळवुन दिल्या बद्दल बॄहनमुंबई महानगरपालीका, पालीका आयुक्त, माननीय महापौर, सन्माननीय नगरसेवक, आमदार, खासदार, ही घाण साफ करण्याचे आदेश देण्याऐवजी नको त्या, भलत्याच गोष्टी करत बसलेले तसेच घराकडे दुर्लक्ष करुन, ते साफ करायचे सोडुन राज्य भर संचार करत राहीलेले आपापले, आपले तारणहार नेते मंडळी, व समस्त भुमीपुत्रांचे, उपऱ्यांचे, आपल्या माणसांचे, परक्या माणसांचे सर्वांचे हार्दीक अभिनंदन.

खंत एकच वाटते की कठोर परीश्रमानंतर ही आपल्या क्रम जगात सातवा लागला. ही एक लांछनास्पद बाब आहे.

आपण सर्वांनी अधिक काळजी व मेहनत घेतल्यास आपण नक्कीच पहिल्या क्रमांकावर येवु शकतो.

कठोर परीश्रमास पर्याय नाही. शिस्तीने राष्ट महान बनते.

No comments: