Sunday, August 24, 2008

लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी आणि क्रिकेट

या लॉ ऑफ डिमीनीशींग मार्जीनल युटीलीटी च्या नियमाप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा जसाजसा अधिकाधिक आस्वाद घेत जातो तस तसे त्या बद्दलची आपली आसक्ती, ओढ कमी होत जाते व एक वेळ अशी येते की ती आपल्याला नकोशी व्हायला लागते.

लग्नाची पंगत , जिलेबी, मठ्ठाचा बेत, ताटातली पहिली जिलेबी आपण मठ्ठात बुडवुन मुखी सारतो, अहाहा काय स्वाद आहे, ब्रम्हानंदी टाळी लागते, दुसरी, तिसरी, चौथी , पाचवी जिलेबी , आपण हाण हाण हाणतो, मजा येते, अजुन एक अजुन एक करत जिलेब्यांची थाळी संपवु लागतो, मग हळु हळु वेग मंदावत जातो, पोट व मन तुडुंब भरतो, आत्ता बस्स. आणखी खाणे मुश्किल. मग आग्रहाचे वाढणे. एक वेळ अशी येते की आता आणखी खाल्ली तर वमनच होईल.

पण प्रत्येक नियमाला अपवाद असतातच.
आपल्या देशातले क्रिकेटचे वेड हा या नियमाला अपवाद. पुर्वीच्या काळी फक्त हंगामात खेळला जाणारा हा परकीयांचा खेळ आता दिवस रात्र ,चोवीस तास केळाला जातो व त्याच उत्साहाने भारतीय पहात रहातात, कंटाळा म्हणुन यायचे नाव नाही.

मग ह्या वेडापोटी ऑलींपिक्स मधल्या भारताच्या यशाअपयेशाकडे भारतीयांचे दुर्लक्ष होते. चार वर्षातुन येणारे सामने येवडाच त्याचा अर्थ. मग त्यात आपण भाग घ्यायचा ही औपचारीकता पाळण्या पुरतेच आपला देश हा ऑलींपिक्सकडे बघत असवा.

वर्तमानपत्रही एवढी क्रिकेटमयी झालेली आहेत की परवाच्याला जी दोन पदके कुस्तीत व मुष्टीयुद्धात मिळाली त्याची बातमी देतांना त्यांना त्या बातमीत क्रिकेटचा उल्लेख करण्याचा मोह आवरला नाही. म्हणॆ "या यशामुळे मुळे भारतानी श्रीलंकेवर मिळवलेल्या एक दिवशीय सामन्याकडे म्हणे कोणाचे लक्ष गेले नाही".

आता पुढील ऑलिपिक्स चार वर्षाने.

अग्रलेख, लेख तेच असतील. भारत अपयेशी का ठरतो यांची कारणमिमांसा करणारे.

No comments: