Thursday, December 24, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन - संपायलाच हवे होते का ?


योध्दा आपल्या भात्यातील अमोघ शस्त्र, ब्रम्हास्त्र, निर्णायक क्षणासाठी, अखेरच्या घडीसाठी राखुन ठेवतो , व त्याच्या वापराने युध्दाचा शेवट करतो, विजय प्राप्त करतो, अगदी तसेच सुर सिंगार संसदनी या आजच्या अखेरच्या दिवसासाठी , अप्रतिम कार्यक्रम सादर करुन रसीकांची मने घायाल करायला, काबीज करायला, त्यांना लुभावयाला केले, अलविदा करतांना त्यांनी सुखद आठवणी घेवुन परत पुढच्या बर्षी होणाऱ्या संगीत संमेलनाची प्रतिक्षा करत रहावी या कारणे.

मुंबईच्या पुर्वा भावे व कनीनिका निनावे यांचे भरतनाट्यम , खैरागड वरुन आलेल्या चंदन सिंग यांचे कथ्थक , मुंबईच्या सुचित्रा राणे यांचे कुचिपुडी नृत्य, पुण्याच्या पायल उंब्रानी व स्वरश्री देव यांचे कथ्थक आणि अखेरीस गुरुवर्य पं. दिपक मुजुमदार व त्यांचे शिष्य श्री. पवित्र भट यांचे भरतनाट्यम.


आता वाट बघणे "कल के कलाकार संमेलनाची "













No comments: