Thursday, May 29, 2008

कुणाची सोय तर कुणाची गैरसोय


दुकानदारांची तक्रार रास्त आहे, या नव्या नवलाईच्या बसथांब्यांमुळे पाठीमागील दुकानदारांचे हवा, उजेड, बंद झाले आहे, जणु काही त्यांचे स्वातंत्र हिरावुन घेतल्यासारखे. त्यांची दुकाने या मागे साफ लपली गेली आहेत, त्यांच्या धंद्यावर याचा विपरीत परीणाम होवु शकतो.


दिवसभर बिचाऱ्यांना डोळ्यासमोर ग्राहकांऐवजी ह्याचा पत्राच नजर येतो.


त्यांची मागणी एकच, निदान हा मधला पडदा तरी हटवा, मोकळा श्वास तरी घेता येईल.

No comments: