Sunday, May 25, 2008

कल के कलाकार संगीत महोत्सव - दिवस अखेरचा




आजच्या शेवटच्या दिवशी एकीकडे भोपाळ वरुन आलेल्या सौ.सुलेखा भट, औरंगाबादच्या डॉ.वैशाली देशमुख यांचे सुरेख गाणे, कोलकोताच्या सौरवब्रता चक्रबोरती यांचे ऐकायला दुर्लभ असलेले असे वाद्य, "सुरबहार " वादन हे अप्रतिम कार्यक्रम ऐकल्याचा हर्ष व दुसरीकडे त्याच बरोबर "कल के कलाकार संगीत महोत्सव" संपल्याचे दुःख अशी काहीशी विचीत्र मनस्थिती.



तरुण पिढी किती गुणी आहे.



आयोजकांची नेहमीचीच रड. लोकांपर्यंत हा संगीत महोत्सव पोचवायला ते कायमचे कमी पडतात.



एका ही वर्तमानपत्रात यासंबधी काहीही लिहुन येत नाही. या मुळे हे गुणी कलावंतांना हवी तशी प्रसिद्धी मिळत नाही, त्यांच्या गुणांचे योग्य ते कौतुक केले जात नाही, अनेक रसिक या कार्यक्रमापासुन माहीती नसल्यामुळे वंचीत रहातात ही खंत.

No comments: