Tuesday, May 13, 2008

दोन फुल एक हाफ

कॉलम लिहावा तर तंबी दुराईनेच.

११ मेच्या लोकरंग मधे मराठी माणसांबद्द्ल तंबी दुराई म्हणतात की .

"सभा संपवुन परतणारे माराठी बंधू, माता आणि भगीनी सगळे खात्यापित्या घरचे दिसत होते. मी सटवाईला म्हटलं ’यांच्या भाषेचा आणि संस्कॄतीचा काही प्रॉब्लेम दिसत नाही. मग हे आकांडतांडव कशाला ? सटवाईनं माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाली. पॄथ्वी आपोआप आणि आपल्या ठरलेल्या गतीनं फिरते, हे ठावुक आहे ना तुला ? "

मी म्हटलं ’हो. पण त्याचा इथं काय संबंध ? ’

फिरत असलेल्या पॄथ्वीवर हात ठेवून उभं रहायचं आणि म्हणायचं, मी फिरवतोय या पॄथ्वीला. मी हात काढला की पॄथ्वी थांबेल आणि सगळं नष्ट होईल! तर असा पॄथ्वीवर हात ठेवुन कॉन्फिडन्टली काहीही न करता जो उभा असतो तो राजकारणी नेता ! आणि त्यानं घातलेल्या खोट्या भितीमुळे घाबरलेले असतात ते सामान्य नागरीक. बुद्धीवंतांचा समावेश ही अखेर सामान्य नागरीकांतच होत असतो, हे लक्षात ठेव !’

No comments: