Wednesday, December 03, 2008

अशी माणसे

ओळखीचा चोर जीवे मारी म्हणतात हे नक्कीच खरे असले पाहिजे. 
 
मुंबईला जाण्यासाठी दोन दिवस भाड्याची इंडीका गाडी ठरवायची होती, म्हटले संकुलातच दुकान असणाऱ्याची ठरवली म्हणजे बर. 
 
"गाडी हवी होती."
"मिळेल ना, केव्हा हवी." 
"पुढच्या शनिवार, रविवार साठी, मुंबईला जायचे आहे, असा माझा कार्यक्रम आहे. 
६ रुपये कि.मी. नी गाडी पडेल, रात्रीचा चालकाचा भत्ता वेगळा, २५० कि.मी. दिवसाला कमीतकमी. टोल तुमचा. गाडी तुमच्या कडे असल्यामुळे मग तुम्ही गाडी कोठेही फिरवा,  आम्हाला कि.मि, प्रमाणे पैसे मिळाल्याचे कारण. जाण्याआधी दोन दिवस अगोदर आगावु रक्कम द्या."
"ठीक आहे. मी गुरुवारी येतो."
 
गुरुवारी पैसे द्यायला गेलो. त्यांनी बाहेर उभ्या असलेल्या आपल्या मुलाला बोलवले.
 
"यांना दोन दिवसासाठी गाडी हवी आहे."
 
मुलानी आपला मोबाईल काढुन फोन लावायला सुरवात केली. पुढे काय होणार आहे याची चाहुल लागल्या मुळे मी अस्वथ.
 
"५००० हज्जार रुपये होतील."
 
मी अवाक. काहीही न बोलता दुकानातुन उठुन बाहेर. त्यांच्या वडीलांच्या हिशोबाप्रमाणे ३३०० रु. होत होते.
 
प्रसंग दुसरा.
 
नुकतच लग्न झाले होते. बायकोला सोन्याचा नेकलेस घ्यायचा होता. गिरगावात म्हाप्रळकरांकडे गेलो. 
 
"मी अमुक तमुक यांचा मुलगा. नेकलेस घ्यायचा आहे."
 
"हो ना. ओळखतो मी त्यांना ते नेहमी छोट्या छोट्या वस्तु घ्यायला येतात."(कुठे एखाद्या बारश्यासाठी लहानसे कानातले इं. घेणार) 
 
दोन नेकलेस आवडले.
 
म्हाप्रळकर म्हणाले.
 
"दोन्ही नेकलेस घेवुन घरी जा, घरच्यांना दाखवा, आवडाला तो ठेवुन घा, दुसरा परत करा"
 
"अहो पण माझा कडॆ एवढे पैसे नाहीत."
 
"मी तुमच्याकडॆ पैसे मागतो आहे काय ?"
 
विश्वासाने त्यांनी आम्हा अनोळखी जोडप्यांना दागिने एकही पैसा न घेता घरी न्यायला दिले.    
 
आता बोला. 
 
ओळखीचे बरे की अनोळखी ?  

No comments: