Monday, December 08, 2008

अशी माणसे.

आम्ही पैसे दिले आहेत. तेव्हा हिशोब मागणे हा आमचा हक्क आहे.

सहा वर्षापुर्वी हाती घेतलेल्या फार मोठ्या स्वच्छता मोहीमेत लोकवर्गणी काढली तेव्हा रहिवाश्यांनी मारुनमुकटुन जेमतेम घरटी दर महा रु. २५ व दुकानदारांनी र.५० वर्गणी दिली, ते ही दोन महिने आणि ते सुद्धा दहा वेळा खेपा मारल्यानंतर.
एका गल्लीत किती रहिवासी, दुकानदार असुन असुन असणार आहेत ? किती वर्गणी जमा झाली असेल ? आणि या दोन महिन्यांच्या जमा झालेल्या तुटुपुंज्या रकमेवर गेली सहा वर्षे नागरीक संघटनेचा कारभार कसा चालवला गेला असेल ? दरमहा सफाई कर्मचाऱ्याला पगार कुठुन देत असतील ? २०-२५ वर्षे तुडुंब घाणीने भरलेल्या घरगल्या , ज्या मधुन जवळजवळ ५०-६० ट्रक भरुन कचरा काढला गेला त्याला किती खर्च आला असेल ? तीन चार महिने काही अतीउत्साही लोकांनी या साठी किती कष्ट उपसले असतील, दिवसरात्र ? हा प्रकल्प पहायला येणाऱ्या मोठमोठ्या लोकांच्या सरबाईत किती खर्च आला असेल ? या तीन-चार जणांनी मिळुन अतिरीक्त खर्चाचा किती भार उचलला असेल ?
कशाचाही विचार न करता ते गॄहस्थ सहा वर्षापुर्वी दिलेले ५० रुपये अजुनही लक्षात ठेवुन होते, ते गॄहस्थ ते शेजारी जे आम्हा सर्वांना आमच्या जन्मापासुन चांगलेच ओळखुन आहेत. अगदी घरचे संबंध. त्यांना सांगणॆ एकच होते जेव्हा आपण गॄहनिर्माण सहकारी संकुलात रहातो तेव्हा आपण दरमहा ५०० रु पासुन कितीही रक्कम देत असतो ना. मेंटेन्ससाठी. ही माफक रक्कम ( जी पुढच्या महीन्यात १५ रु. केली गेली ) आपण आपला परिसर स्वच्छ रहाण्यासाठी देणार आहोत.
तरी बरे एक वर्ष पुरे झाले तेव्हा सर्वांना बोलवुन पै न पै चा हिशोब दिला होता.
मुंबईचे शेरीफ व दोन रहीवासी यांनी या कामाने प्रेरीत होवुन एकुण २१,००० रु. देणगी दिली. ती रक्कम बॅकेत मुदतीची ठेव ठेवुन अजुन पर्यंत आम्ही लोक कारभार खेचत आलो आहोत. तरी बर पैशाचा कारभार एका प्रतिष्टीत जेष्ट नागरीकांच्या ताब्यात सुरवाती पासुन दिला.

त्या रात्री वाईट वाटुन घेवुन रात्र भर झोपलो नाही.

No comments: