Friday, December 05, 2008

क्या कुल है हम ! कौन बनेगा मा.मु.? और कौन मारेगा "फुंक" वेदनांवर?

आपण कोणत्या परिस्थितीत नेता निवडतो आहे याचे ही भान या कौग्रेसी नेत्यांना नसावे ? दिवसभरच्या आमदारांशी चर्चा मग सर्वसंमतीने नेता निवडीचा अधिकार पक्षश्रेठींना देणे ही नेहमीचीच , दरवेळीची नौटंकी निदान या वेळी तरी होणार नाही असे कुठेतरी वाटत होते. 

कोठेतरी वाटत होते तडकातडफी एखादा कणखर नेतॄत्व असणाऱ्याचे नाव ( Oh no. Not him ) कोणताही घॊळ न घालता तत्काळ जाहीर होईल, कारण शेवटी हा जनतेचा गमवलेला विश्वास, त्यांचा आत्मविश्वास परत मिळावण्यासाठीच हे सारे नाट्य घडत आहे.  आता या कालाव्यपयानंतर बदल झाला काय नी नाही झाला काय एकच. उगीच थोडक्या कालाविधीसाठी कसला उगाच ? 
 
या पेक्षा मग होते ते काय वाईट होते असे म्हणायची वेळ आलीय, 
 
खर म्हणजे काल "अखेर गंगेत घॊडे न्हाले" असे आधी शिर्षक ठरवले होते. 
 
प्रगतशिल महाराष्ट्रात कर्तबगार राजकारणी मंडळींच्या कॄपेने, वीज नव्हती, लोडशेडींगच्या अंधारात कोण झाले मुख्यमंत्री हे कळायला वाव नव्हता. काल दुपारी तीन वाजता नाव जाहीर होणार होते. 


आज दुसरा दिवस उजाडला, मागच्या पानावरुन पुढे लिखाण सुरु.     

No comments: