Thursday, December 25, 2008

यहा तो बेचने वालो ने

नशेमन ही के लुट जाने का ग़म होता तो क्या ग़म था
यहा तो बेचने वालो ने गुलशन बेच डाला है ॥ -

मुंबईमधे झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ला नंतर राजकीय नेते आणि पक्ष यांच्या बेजबाबदार वागणुकीचे प्रदर्शन पहायला मिळाले.
आता तर मुंबईमधे पाकिस्तान वर हल्ला करा, युध्द करा अशी चिथवणी देणारे फलक लागले आहेत, हुतात्मा चौकात आता काहीतरी कार्यक्रम ही होणॆ आहे.
अश्या रितीने वागुन हे नक्की काय, कोणता राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतात ? यांच्याच राज्यात कारगील मधे आपण मार खात होतो ना ? संसदेवरील हल्ला, अक्षरधाम वरील हल्ला, देशाचे गृहमंत्र्यांचे अतिरेक्याला सोडायला कंदाहरला जाणॆ झाले ना ? मग आत्ताच हा ज्वर निर्माण करण्याचे प्रयोजन काय ? येणाऱ्या निवडणुका ?

ही सर्व नौंटकी का व कशासाठी ?

No comments: