Wednesday, December 03, 2008

अखेर विलासराव गेले तर

कसे नशीब असते बघा, या अतिरेक्यांच्या हल्ला आधी पदावरुन गेले असते तर नामुष्कीली पदरात पडली नसती, आता त्यांची नोंद इतिहासात फारश्या चांगल्या शब्दात लिहीली जाईल असे वाटत नाही.
 
नविन येणारे मुख्यमंत्री मनात म्हणत असतील, 
 
"बरे झाले रे देवा, या आधी नाही झालो ते. अपयशाचा धनी व्हावे लागले असते."
 
आता असे वाटते की आपल्या राज्याला एक नवीन चेहरा असलेला, कणखर नेता मिळाला हवा ज्याच्या मुळे सामान्य माणसाला आपले जीवन सुरक्षीत वाटॆल. नेहमीचीच तीच तीच आलटुन पालटुन येणारी माणसे आता नकोशी झाली आहेत. 
 
श्री. पॄथ्वीराज चव्हाण यांच्या बद्द्ल, त्यांच्या कार्यक्षमतेबद्द्ल,   मी फार चांगले वाचलेले आहे. ते आपले मुख्यमंत्री बनतील तर मला आवडेल.  
 
पण शेवटी यांचे शहकाटशहाचे राजकारण आहे ना !!

1 comment:

Deepak said...

अगदी मनातले बोललात... बघुया...
आलिया भोगाशी, असावे सादर... भार देवावरी ठेऊनिया..!