Sunday, December 21, 2008

राज ने कर दिया नाराज

चुकुनही खाजगी वाहन वाहतुकीच्या वाट्याला न जाणारे राजाभाऊंनी काल का कोण जाणे पुण्याला जाण्यासाठी "राज ट्रॅव्हल्स" च्या बसमधे जागा आरक्षित केल्या आणि पस्तावले, कदाचीत ते त्या दिवशी दुपारी अंधेरीला होते, सोबत वयस्कर माणसे होती, तेव्हा शिवनेरीसाठी दादरला न जाता जवळच्या वांद्रा येथुन बस पकडणॆ सोईचे वाटले असल्या मुळे, पण झाली दुर्बुद्धी झाली खरी, त्याची फळे आता त्यांना भोगायची होती.

आराम हॉटेल, कलानगर जवळ उभे रहायला त्यांना सांगितले गेले. तेथे गेल्यानंतर नशिबाने कळले आपल्याला राज ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यानी चुकीची माहीती दिली, बस येथे येत नसुन कलानगरच्या सिग्नल जवळ येते.
बस सुटायची होती २.४५ वाजता. संगितल्या प्रमाणॆ दुपारी २.३० वाजता जागी पोहोचलेले ते व त्यांचे वयस्कर नातलग, भर दुपारी, उन्हात, रस्तात सव्वातास बसची वाट बघत ताटकळत उभे, झक मारले आपण यांच्या नादाला लागलो या विचाराने स्वतःला दोष देत.

संतापुन राजवाल्यांना राजच्या कार्यालयाला दुरध्वनी लावला, एकाकडुन दुसऱ्या कडॆ दुसऱ्या कडुन तिसऱ्याकडॆ असा तो कॉल फिरत राहीला , पारा वरवर चढु लागला, प्रत्येकाला ह्या बसला झालेल्या विलंबाने, दिरंगाईने होत असलेला त्रास सांगण्यात त्याची शक्ती खर्च होवु लागली,

प्रत्येक वेळीस जबाबदार प्रमुख व्यक्तीशी मला बोलायचय, बोलायचय करता करता वेड लागायची पाळी आली. शेवटी राजाभाऊंनी संतापुन " आता या शारीरीक व मानसीक त्रासाबद्द्ल मी आता ग्राहक न्यायालयात जाणार असल्याचे त्या माणसाला सांगीतले.

त्या "जबाबदार" माणसाने "तुम्हाला काय करायचे ते करा, जरुर जा " असे उर्मटपणे सांगुन फोन ठेवला.
राज ट्रॅव्हल्स सारख्या एका मोठ्या प्रतिष्ठीत कंपनी कडुन ही वागणुक त्यांना अपेक्षीत नव्हती.
तेव्हा आता .........

1 comment:

Vivek S Patwardhan said...

Sorry to learn that a great lunch meeting was followed by a disappointing experience. Travel personnel are often insensitive. It hurts when senior citizens are involved. Hope Raj travels tracks this post and learns its lessons.
Vivek