Saturday, December 27, 2008

जनाचे अनुभव पुसता - लेखक डॉ.मिलिंद बोकील

आतापर्यंत मिलिंद बोकील यांना मी एक कथालेखक म्हणुन ओळखत होतो, मध्यंतरी त्यांचे "झेन गार्डन " परत वाचले होते. अचानक त्यांची एक समाजशास्त्रज्ञ म्हणुन ओळख समोर आली ती "जनाचे अनुभव पुसता" हे पुस्तक वाचता. 

नैसर्गीक साधन संपत्ती व माणूस यांच्या मधल्या विविध संबधांचे वर्णन करणारे सहा लेख यात आहेत.

"उदक चालवावें युक्‍ति", "प्राण्यांना अभय, माणसांना वनवास ", "लढाई जमिनीसाठी", "किनाऱ्याचा कल्पवॄक्ष ", "भूमिकन्यांचे भालप्रदेश" आणि "भरती आणि ओहोटी’  आदी लेखांमधे त्यांनी पर्यावरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, आणि पुरातत्त्व, मानवशास्त्र आदी अनुषंगाने नैसर्गीक साधनसंपत्तीची मालकी व तिचे वाटप, प्रकल्पग्रस्थांच्या परत त्यात कोयनेत अभयारणय घोषीत झाल्याने तेथे रहाणाऱ्यांच्या जीवनावर आलेली आपत्ती, मराठावाडयात सरकारी जमीनीवर, गायरानात झालेले अतिक्रमण, घोलवड परीसरात चिकुच्या लागवडीमुळे झालेले परिवर्तन, आर्थीक क्रांती,  मराठवाडयात झालेल्या भीषण भुकंपानंतर विधवा स्त्रीयांचे शेतीच्या आधारे पुनर्वसन, व धरमतरची खाडी, इस्पातच्या कारखान्यामुळॆ पर्यावरणाचा झालेला विनाश, अपार हानी, त्यामुळे आजुबाजुच्यां गावातील लोकांना विस्थापीत व्हायला लागणे आदी विषयांबद्द्ल , स्वानुभवातुन अभ्यासपुर्वक मांडणी केली आहे.

अनेक संस्था, समाजसुधारक, कार्यकर्ते , त्याचे कार्य, त्यांनी घडवुन आलेले परिवर्तन वाचता खोल मनात कुठेतरी एक कळ उमटुन गेली. अरे आपल्यालाही असेच काहीतरी करायचे होते. 

Tata Institute of Social Science मधुन MSW करायचे आपले स्वप्न होते, Govt. Law College मधे कायद्याचा अभ्यास करताकरता MSW करायचे होते. NSS मधुन जोमात काम करता निर्मला निकेतन ,TISS यांचा परिचय बऱ्या पैकी झाला होता, त्याच वाटॆवरुन पुढे चालायचे होते. 

पण जर आपल्याला काय हवयं हे कळत असतें तर.                  

No comments: