Thursday, December 25, 2008

पदपाथ ? आणि सिंहगड रस्तावर ? भलतच काय तरी काय !

पदपाथ ? छे, काय भलतेच काय बोलता तुम्ही राव ? अस कधी घडलय काय ? नगरनियोजनात हे कधी अस काय बसतय का ? तुम्हाला ठावं नाहि का भाऊ, रस्ते हे फक्त आणि फक्त त्या वर धावणाऱ्या वहानांसाठी असतात.
पायी चालणाऱ्यांचे काय म्हणुन काय वेड्यासारखे विचारता राव , माणसं काय त्यांना कुठुनही कसही , अधुन मधुन रस्त्यामधुन चालायची सवय असते ( जीव मुठीत घेवुन ), ती काय कशीही रस्तातुन चालतील पण वहाने कशी सरळ शिस्तीत सुसाट वेगाने धावायला हवीत की नाही;
अस जर नसते तर नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड ) रस्ता, जेथे रूंदीकरणाचे काम चाललयं, रस्तावरची बांधकामे पाडली गेली , मोकळा केला गेला, क्रौंक्रीटीकरण होणॆ सुरु आहे, ज्या रस्तावरुन लाखो माणसे , पादचारी पाय़ी चालतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांना चालण्यासाठी दोन्ही बाजुला कडॆला पदपाथ नक्कीच बांधले गेले असते की.

No comments: