Saturday, December 13, 2008

माणसं !- लेखक - अनिल अवचट.

काही लेखक झपाटून टाकतात, भारावुन टाकतात, मन सुन्न करायला लावतात, विचार करायला लावतात, मन शरमेने खाली घालायला लावतात, वाचकांना आपल्या बरोबर घेवुन जातांना. समाजाबद्द्ल त्यांनी केलेला विचार पाहुन जगण्याचा एक नवा दॄष्टीकोन ते आपल्याला देत रहातात.

पुर्वीचा एक लेखक धरुन त्याची सर्व पुस्तके वाचुन काढण्याचा परिपाठ कालगतीत कोठेतरी हरवुन गेला, या धकधकीच्या, वेगावान, ताणतणावाच्या जीवनात वाचनच होईनासे झाले तसे त्या वाचनाला दिशा मिळाणेही नाहीसे होत गेले. आता मात्र वाटायला लागलय पुन्हा एकदा वाचन सुरु होत चालले आहे.

माणसं !- लेखक - अनिल अवचट.
"एकंदरीत "हाकलले जाणॆ" हेच ज्यांच्या जीवनाचे सूत्र" अश्या कष्टकरी, नाडलेल्या, पिडलेल्या आपल्याच समाजातील "आपल्यांचेच" वर्णन करणारे हे पुस्तक. अनिल अवचटांची तशी ज्वळजवळ सर्व पुस्तक वाचुन झली असतील पण सलग पणे नाही तेव्हा आता परत एकदा अनिल अवचट. एखादे पुस्तक आपण परत एकदा वाचायला घेतो तेव्हा ते आपल्याला जास्तच भावत जाते, अधिक उमजत जाते, त्यातली सौदर्यस्थळ नव्याने जाणवायला लागतात.

आता पर्यंत प्रस्तावना वाचणॆ कधी फारसे जमले नव्हते. पण -

"जगभरचा हा रिवाज पाहून कोणी असेहि अनुमान काढलेले आहे की प्रत्येक देशातील मानवी समाजाला अशी एखादी जमात आपल्यामधे असण्याची गरजच भासत असावीसे दिसत, की जिच्या माथी समाजातील सगळे दोष व सगळी घाण लादता येइल, जिला सतत राबवून घेता येइल, जिची सतत हेटाळणी आणि कॄर थट्टा करता येईल. जिच्यातील पुरुषांना घाण्याचे बैल बनविता येईल व स्त्रियांना भोगदासी म्हणून वापता येईल " हे श्री. नानासाहेब ग. गोरेंनी लिहीलेले वाक्य वाचले आणि मग ती वाचल्यावाचुन राहवले नाही.

केवळ जगण्यासाठी, केवळ हा देह चालता, बोलता, फिरता रहावा म्हणुन, त्यातली धुगधुगी जेवढ्यापर्यंत तेवत रहाता येईल तो पर्यंत. ढोरमेहनत, ढोरमेहनत आणि शेवटी खाटिकखान्यात पोचलेल्या ढोरासारखे मरण हेच ज्यांच्या पाचवीला पुसले आहे ते, मग ते गावाकडॆ मानाने जगणारे पण दुष्काळग्रस्त झाल्याने देशोधडीस लागणारे असोत की जन्मभर कशाकशाची बोझी वहात त्या बोझ्यांखाली पिचत जात रहाणारे हमाल असोत. शहरात उदारनिर्वाह साठी येवुन नरकावस्तेतील झोपडपट्ट्यांमधे रहाणारी असोत की .....

सर्वांची कथा, कर्मकहाणी आणि व्यथा एकच.

हि अशी मनाला आलेली अस्वस्थता घालवण्यासाठी "छॆ , हे असे कधी असते काय ? डॉ. नी जरा अतीच भडकपणॆ, अतिशयोक्ती करीत लिहिले आहे" अशी मनाची वांझोटी समजुत घालत आता रहायला हवे.

1 comment:

sonal m m said...

anil avchat hyanchya lekhanacha mazya jadanghadanit molacha vaata aahe. vichar karayla lavnare lekhan, aswastha karun sodnare tyanche anubhav. avghad vatnari ashi vaat tyanni nivadli ayushyat. personal development honyachya vayat samajik bhanahi aale. vastavashi pramanik rahayla tyannich shikavle. hech sanskar mhanayche! aai-vadilanshivay ashya kititari vyakti aaplyavar nakalat sanskar karat astat...maza tya sarvanna salaam.