Thursday, October 30, 2008

भावनांचे राजकारण कुठपर्यंत ?

भडकलेल्या भावनांचे रूपांतर हळूहळू विद्वेषात होवु लागते, आणि हे विद्वेषाचे राजकारण परत सुरु करून आपण मराठी माणसांनी काय साधले ? आपल्याला यातून खरच काय मिळाले ? केवळ राजकीय लाभ ?
आपले नेते एक गोष्ट विसरतात, तत्कालीन लाभापोटी, सत्ता मिळवण्याच्या नादात ।
आज आपली मराठी माणसे जगभर नोकरी, व्यवसाय, शिक्षणानिमीत्ते जगभर पसरली आहेत।
आपण इतरांना जी वागणूक आपल्या महाराष्टात देत आहोत त्याची चेन रिअक्शन म्हणुन तेथले स्थानिक लोक या परप्रांतीय मराठी मानसांवर बुमरँग सारखे उलटु शकतात।
परवा मुंबइच्या लोकल ट्रेन मधे चार परप्रांतियांना झालेल्या अमानुष माराहाणीत एक तरुण नाहक मरण पावला , तर एक तरुण माथेफिरू होवुन बस मधल्याना धमकावु लागला व पोलिसांकडून मारला गेला।
हा आपला ढळलेला तोल आपल्याला कुठवर घेवुन जाणार आहे ?

1 comment:

Vivek S Patwardhan said...

Wah, Harekrishaji. Aamchya manaatle bollat!
Vivek