Tuesday, October 26, 2010

हल्लीच्या काळात

रानावनात , डोंगरदऱ्यात भटकंती करतांना, वाट काढत आपल्या इच्छीत स्थळी पोचतांना केव्हा केव्हा गोंधळायला होते, फुटणाऱ्या असंख्य पायवाटॆतुन, गुरांच्या वाटॆतुन नक्की कोणती वाट पकडायची ?

पण आता गाववाल्यांनी हे रस्ते शोधणे सोप्पे केले आहे.

या साऱ्या वाटांवर अनेक ठिकाणी खुणेला सापडतात ती गुटक्याची, पानमसाल्याची वेष्ट्ने. त्यांचा माग काढत जायचे.

बरोब्बर पाड्यावर पोचाल.

No comments: