Sunday, September 05, 2010

सज्ज्नगडाचे दुर्जनांनी केलेली दशा

सज्जनगड, समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धन्य झालेला गड.

आता पर्यंत या किल्लाने अनेक परकीयांची आक्रमणे सहन केली, परतवुन लावली, परत स्वकीयांच्या ताब्यात तो आला.

पण.

कालाय तस्मे नम:

स्वकीयांकडुन होणाऱ्या आक्रमणापासुन, त्यांनी चालवलेल्या हेळसांडपासुन आता मात्र सज्जनगड स्वताचे रक्षण करायला कमी पडतो आहे.

लानत है ! लानत है "

माथ्यावर जिथे गाड्या उभा रहातात तिथेच लावलेल्या दोन भल्या मोठ्या जाहिरात फलकांनी त्याला झाकुन टाकलयं, आणि वर जी गडावर दुर्दशा झाली आहे त्यासाठी समर्थांच्या मदतीला आता गाडगेमहाराजांना हाती खराटा घेवुन यावे लागणार आहे.

प्रवेशद्वारावरच्या दोन तळ्यांमधे समर्थ नक्कीच स्नान करत असणार आणि आज त्यांचा काय अवतार झाला आहे !







आणि समर्थांची समधी, श्रीराम मंदीर यांच्या देखणेपणात या वेड्यावाकड्या लावलेल्या , पसरलेल्या तारा बाधा आणत आहेत.

पाऊस असल्यामुळे जास्त फोटो काढता आले नाहीत.

हि अस्वच्छता नाही बघवत.

No comments: