Saturday, April 30, 2011

राजाभाऊंच्या नशिबी

राजाभाऊंच्या नशिबी काय आज आमटीभात खाणे नव्हते.

ऑबेरॉय मॉल मधे दुपारी राजधानीमधे भरपेट भोजन झालेले. 

राजधानीचा त्यांना आलेला निरोप, "आमरस पुरीचा बेत आहे, तेव्हा येणे करावे "
आणि नेमके त्याच वेळी योगायोगाने त्यांच्या माजी सहकाऱ्यांसोबत बाहेर जेवायला जाण्याचा बेत.

पण आजचा दिवस तसं म्हणायला गेलं तर फारसा उत्साही नव्हता.

राजधानीमधे आज जेवण वाढणे फार  वेळखाऊपणाचे झाले होते.
जेवायला सुरवात करण्याच्या वेळी छोट्या छोट्या वाट्यांमधे वाढलेल्या इवल्याशिवल्या भाज्या.
जेवण संपायला आले तरी त्या वाट्यांना आपण परत केव्हा भरल्या जाणार याची वाट  बघायला लागणे, मग अश्या वाट बघणाच्या काळात साऱ्या भोजनाची पुरती वाट. जेवणातील मजा गायब.


एकदा श्री. सिद्धार्थ काक नी लिहिले होते,  " अरे माझ्या घरात उपहारगृह सुरु झाले आहे "
ते  पुर्वी या घरात रहात असत. त्यांच्या जागेत "डायनॅस्टी " आलयं.

राजाभाऊं हे चायनीस जेवणवाले "डायनॅस्टी" काही फार पसंद करत नाहीत,. हे हॉटॆल लोकांच्या आवडीचे. फार लोकप्रिय.

राजाभाऊंच्या मते त्यांना जसं जेवण हवे असते तसं नसतं.
 Fine Dinning experience काही येणॆ नसते,



एकतर येथे खुप गर्दी असते,   प्रतिक्षेचा काळ ् मोठा असतो. 

आज रात्री म्हटलं साधे जेवण जेवावे. आमटीभाता सारखे दुसरे काय असु शकते. पण ते त्यांच्या नशोबी नव्हते.

No comments: