Sunday, March 22, 2009

मंदीच्या काळात आणखी एक बांधकाम कंपनी बंद पडली. ???

कधी कधी शंका येते की या मंदीच्या दिवसात कसे सारे बांधकाम प्रोजेक्ट थंडावतात, घरांना, जागेला उठाव नसल्यामुळे बांधकाम स्थगित केले जाते त्यातला तर हा प्रकार नसावा. 

पण बहुदा तसे नसावे , मंदी तर ही अलीकडची आणि आपण बांधकाम करायला काढलय हे तर ते बिल्डर गेले कित्येक वर्षे विसरुनच गेलेले आहेत.

कि आपण बांधत असलेली बांधकामं आता विकली जात नसल्यामुळॆ मग हे व्यवसायाचे डायवर्टसीफीकेशन तर नसावे ना ? 

--------
दै.सकाळ, पुणॆ, २२/०३/२००९

मुख्खार अब्बास नकवींचे विधान : "अयोध्यात राम मंदीर बांधायला भाजपा ही काही बांधकाम कंपनी नाही !"

1 comment:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

छान.
काही बांधकाम कंपन्या बांधकामाच्या व्यवसायात उतरल्याच नसत्या तर .......