Friday, May 13, 2011

अचानक

अचानक 

अचानक वाचनालयात सेतु माधव पगडींचे "मिर्झा गालीब आणि त्यांच्या गझला " हे पुस्तक हाती लागले. का कोण जाणे परत केव्हातरी वाचु करत बाजुला ठेवलेले. खुप काळ उलटुन गेला परत ते पुस्तक काही सापडलं नाही. रुखरुख मनात भरुन राहिलेली.

अचानक 

अचानक रात्री केव्हा तरी झोपेत आठवलं, सेतु माधव पगडींचे संपुर्ण साहित्य आठ खंडात जे प्रकाशित झाले आहे त्यामधे हे नक्कीच सापडेल.  पाचव्या खंडाचा खजिना हाती आला खरा, पण नेमके त्याच वेळी खिशाला भलेमोठाले भोक पडलेले. 

चावीच्या घड्याळाप्रमाणे आणखी कशाला चावी देता आली असती तर किती बरं झाले असते,  जेवढी हवी तेवढी चावी द्या, हवे तर चालु ठेवा हवे तर बंद करा,  हे मात्र काही अचानक वाटणे नाही. 

कंटाळा आलाय हे मात्र खरे.

1 comment:

Varsha said...

pudhchya veli pustak milo ani vachanyachi te yogahi yevo hi aamchi prarthana deva kade