Sunday, May 08, 2011

अरे गड्या आपले "आस्वाद" च बरे

जाहिरात वाचल्यापासुन गेले दोनचार दिवस राजाभाऊंचा एकच घोशा लागला होता.
" जायचयं मला चांदीच्या ताटात जेवायला जायचयं "
मग ते सहकुटुंब सहपरिवार भोजन करायला गेले.
बेत मोठा खासा. 
आणि मग "बालगंधर्व"

गेले खरे.

राजाभाऊंचा मुलगा त्यांना दम भरु लागला. 
"काय आहे , कशाला ? त्यापेक्षा मोठ्या कोणत्यातरी हॉटेल मधे बुफे ला जावु ?
राजाभाऊंची बायको त्यांना सांगु लागली.
"अरे आपले आस्वादच बरे "
राजाभाऊ म्हणु लागले.
आपली अजुन तीनशे रुपये देवुन मराठमोळी थाळी खाण्याची मानसीकता बनलेली नाही.  आधीच जागा लहान त्याच ही गर्दी ? परत थाळीकडे पाहिल्यानंतर ती त्यांना फारशी भुरळ घालु शकली नाही.

काही काही जागा, काही माणसे , त्यांच्याशी आपले नाही जमत, काही सबळ कारण असतेच, असेल असे नाही, पण नाही जुळुन येत. 

मग राजाभाऊ "आस्वाद " मधे जेवायला गेले.

No comments: