Tuesday, May 17, 2011

वाटलं होतं

आपल्याला फार चुकीचे वाटल्याबद्द्ल राजाभाऊ खुष होवुन गेले. चला कधी तरी आपले चुकले (?) 

वाटलं होतं अभिरुचीत झालेल्या प्रचंड उलटापालटीत हा अंमलताश हरवुन गेला की काय ? हा बहावा आपण कधी काळी बहरत होतो हे विसरुन गेलायं की काय ?

पण नाही, त्याचे सौदर्य आता अधिकच खुलुन उठलयं. अभिरुची आता कात टाकतेयं आणि हा पाठीमागचा नटलेला परीसर त्याच्या मोहवुन टाकण्याच्या गुणात आणखीन आणखीन भर टाकतोयं.






No comments: