Sunday, November 11, 2007

कळतनकळत

आयुष्य जगत असतांना आपल्या हाती बऱ्याच वेळा कळतनकळत अनेक व्यक्ती दुखावल्या जात असतात. आपल्या मस्तीमुळे, रुबाबामुळे, जाणीव नसल्यामुळे, स्वतःला शहाणा समजत असल्यामुळे, इतरांना तुच्छ लेखल्यामुळे, कधी जाणुनबुजुन, तर कधी अजाणातेपणे, दुर्लक्ष केल्यामुळे,लक्षात न आल्या मुळे, गॄहीत धरल्यामुळे, एक ना अनेक कारणामुळे आपल्या हाती दुसऱ्यांवर अन्याय होत असतो.

कधी तरी , केव्हातरी मग ही दुखवलेली माणसे , प्रसंग आठवतात, वाईट वाटते, वाईट वाटुन घ्यायला तसा खुप उशीर झालेला असतो. आणि नसतो ही. अजुनही मी त्यांच्या पाशी दिलगिरी व्यक्त करु शकतो.

No comments: