Tuesday, November 13, 2007

महामानवाचा एक नवा पराक्रम


जगात अवघे ३६०० वाघ शिल्लक - लोकसत्ता - दि. १२.११.२००७.- .


तस बघायला गेल, तर हे पराक्रम प्राचीन काळा पासुनच महामानव करत आला आहे. वन्य श्वापदांची केवळ शौक साठी शिकार करण्यात त्याला फार मोठा पुरुषार्थ वाटतो. त्याचीच हि परिणीती. प्रचंड प्रमाणात जंगले तोडायची, प्राण्यांच्या जागेत आपण अतीक्रमण करायचे, अती प्रमाणात अंधश्रद्दा उराशी बाळगत वाघांच्या अवयवासाठी प्रचंड किंमत देत त्यांची शिकार करवुन घ्यायची.


अनेक जाती, प्रजाती त्याने बिनडोक पणे नष्ट केल्या उरलेल्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्याला ना खेद न खंत.



हि पृथ्वी केवळ आपल्याला रहाण्यासाठी आहे या गैरसमजुतीनेच त्याने , स्वतःच्या स्वार्थासाठी , सुष्टीच्या जिवनचक्राचा विचार न करता केवळ संहार आरंभला आहे.


त्यात परत हे जग समस्त मानवालासाठीच रहाण्यासाठी आहे असाही त्याचा उद्देश नाही , तर हे केवळ आपल्याच संकुचीत विश्वात असणाऱ्यांसाठीच असावे असे त्याला वाटते, जसे की निव्व्ळ आपला समाज, आपला धर्म, आपला देश, मग त्यातुन फोफावतो तो दहशदवाद, आपापसातील युद्धे, आणि संहार.


या निसर्गसाखळीतील आपण ही एक कडी आहे हे तो शक्तीच्या कैफात विसरला आहे, पण निसर्ग हे विसलया आहे काय ?


शेवटी न्याय करणारा व करतो तो निसर्गच.



2 comments:

a Sane man said...

agadi kharay tumhi mhaNata te.

A woman from India said...

खरंय.