Sunday, November 08, 2009

याद राखा अरुणाचल प्रदेशाकडॆ वाकड्या नजरेने पहाल तर.




काश्मिर बद्द्ल कोणीही काहीही वेडेवाकडे बोलले की त्याचा आपण भारतीयांना भयंकर संताप येतो. काश्मिर हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे हे आपण बाह्या सरसावुन ठणकावुन सांगतो, या प्रदेशाकडॆ वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा, दम भरतो.

पण हाच आवेश, ही तिव्र भावना, अरुणाचल प्रदेशाबद्द्ल तेवढ्या प्रमाणात तर जाऊंद्या पण अजिबातच सर्वसामान्य भारतीयांच्या मनात दिसुन येत नाही.

चीन या प्रदेशावर दावा करत राहतो, मधेमधे कुरापत काढत रहातो, कधीतरी मधेच हा प्रदेश कोणत्यातरी , कोणाच्यातरी नकाशातुन भारतातुन गायब झाल्याचे दाखवेले जाते, वाचनात येते, आणि एक साधा ओरखडा पण आपल्या मनावर उमटु नये ?

आज पुज्य दलाई लामा या विभागाला भेट देत आहेत.

जगाला आम्ही सारे भारतीय बजावत आहोत, याद राखा येथे वाईट भावनेने
पाय ठेवाल तर, तंगडी मोडुन ठेवु.

(राजाभाऊंचे एक स्नेही या प्रदेशाला भेट देवुन आले. हे फोटो त्यांच्या सौजन्याने )

4 comments:

Asha Joglekar said...

तितक्याच तीव्रतेने वाटतंय पण मीडिया अबूआजमी बद्दल जितक्या तळमळी ने बोलतो तितक्या जोरकस पणे ह्या मुद्दयावर बोलत नाही .

HAREKRISHNAJI said...

Ashaji,

Thanks for the comments. You are the only one who has commented on this issue. I thought I will open this issue for the discussion. It seems People are just not interested in this topic.

Forget the Press, it's saddening that the rest of the Indians are least bother about the happenings in North-east state.

savtalyogi said...

1962 ka jabaj jasvant baba ki story please blogger pe dalo

savtalyogi said...

1962 ka jabaj jasvant baba ki story please blogger pe dalo