Sunday, November 14, 2010

जान कुर्बान.

गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मऊसुद तांदळाची भाकरी, सोबत मिरचीचा ठेचा, लसणाची चटणी, कारळाची चटणी, आणखीन कसलीतरी चटणी बहुदा शेंगदाण्याची. जान कुर्बान. स्वःताच्याच शेतात पिकलेले धान्य, इकडे दळले, तिकडे चुलीवर त्याच्या गरमागरम भाकऱ्या करुन भुकेलेल्यांच्या ताटी वाढल्या. भुकेलेल्यांनी समाधानाने त्या रिचवल्या. बढिया. आणि मग तोंडी लावायला सोबत मलई कोफ्ता, पनीर मसाला, डाळ तडका आदी आदी.





खरं म्हणजे राजाभाऊंची आणि बाहेर गावी असलेल्या रस्तांलगतच्या हॉटेलांचे फारचे काही सख्य नाही.(बहुदा येथे दारु पिण्यासाठी येणाऱ्यांमुळे) तरी पण हडशीला श्री. सत्यसाई पांडुरंग क्षेत्राला जातांना सावरगाव मधील "हॉटेल निसर्ग" त्यांच्या नजरेत भरले होते, परततांना येथे जेवायला थांबावे केवळ याच हेतुने.

जेव्हा राजाभाऊंना कळाले की हे हॉटेल सुरु होवुन केवळ तीन दिवसच झाले आहेत तेव्हाच येथे फार चविष्ट जेवण मिळॆल याची त्यांनी खुणगाठ बांधली , आणि वरती त्यांच्या स्वच्छ , चकचकीत स्वयपाकघराकडॆ त्यांचे लक्ष गेल्यानंतर आपला हा समज खोटा पडणार नाही हे त्यांनी जाणले. अन्न तोंडी पडल्यानंतर कधीतरी आपल्याला वाटणारे खरं ठरु शकते याची त्यांना जाणिव झाली.

आणि वरती श्री. संजय ओवळ्यांचे अगत्यशील आतिथ्य.

और क्या चाहिये पेट के लिये.

गंमत म्हणजे राजाभाऊ निघाले होते ते लवासाला जाण्यासाठी. काय करणार, बालहट्ट व स्वःस्त्रीहट्ट. मग कदाचीत बहुदा नशिबी असलेल्या खाण्यानेच त्यांना हडशीकडे खेचुन घेतले असणार. ( येथे येवुन दारु पीत बसणाऱ्या लोकांमुळे "निसर्ग" चा माहोल न बिघडो असे राहुन राहुन वाटते.

एकच गोष्ट वाईट झाली, लवासाला पोचेपोचेपर्यंत अंधारुन यायला लागले होते. जणु घाटरस्ता, मुसळधार पाऊस आणि रात्रीचे त्यात गाडी चालवणॆ त्यांच्या मागेच लागलेले दिसते. लवासाला जास्त वेळ थांबणे त्यांच्याने अवघड होत गेले.

1 comment:

Varsha said...

sahi....asa mast jevan milala ki pravas kasa sukhad hoto!!