Friday, November 05, 2010

आवाज की नवल ?

तर मग मनाची ही अशी दोलायमान स्थिती फार त्रासदायक.

दिवाळी पहाट कार्यक्रमाबरोबर आणखीन एक महत्वाचा कार्यक्रम असतो, वाचनालयात ते उघडण्याच्या आधी जावुन रांग लावायची, हवा तो दिवाळी अंक मिळवण्यासाठी. दिवाळी अंकाशिवाय दिवाळीची रंगत कशी येणार ?

"आवाज " आपल्यालाच पहिला वाचायला मिळायला हवा. 
कधी "आवाज" हाती पडतो आणि त्यातले भलतेचं चावट अर्थ सुचवणारे विनोदचित्रांची मजा लुटतो असे व्हायचे.




पण अलिकडे वाटायला लागले आहे की "आवाज" ची जादु ओसरत चालली आहे, त्याच्यात पुर्वीसारखी मजा राहिली नाही, पुर्वीसारख्या दर्जेदार विनोदी कथा राहिलेल्या नाहीत, काहीतरी ओढुनताणुन केलेले बालीश विनोद, ( की आता आपली आवड बदलली आहे ? ) चित्राविनोदातही फारसा दम राहिलेला नाही आहे का ?

या ऐवजी आपल्याला आवडणारा "नवल" घ्यायला हवा होता का ?

 "नवल" , "हंस" जो काही मिळेल तो अंक आणयला हवा होता.

जरी राजाभाऊंच्या बायको या "नवल" आणण्यावर नाराजगी दाखवणार असली तरी कधीतरी सुद्धा.

No comments: