Saturday, February 28, 2009

जागो इंडिया जागो

मीने, मीने, मीने,

आजची वर्तमानपत्रे वाचली की नाहीस. आणि काय ग ? काय हा खमंग वास सुटल्याय म्हणायचे.

छे हो टेकाडॆ भावोजी , सक्काळी सक्काळी कुठला आलाय वेळ , दुनीयेच्या उठाठेव्या करायला , थालीपीठे लावायला घेतल्यात माझ्या नवऱ्यासाठी ,

मीने मीने , अग अस कस करुन चालेल ? याच मुळॆ तर आपण मार खातो. आपलं सरकार बघ की आपल्यासाठी कित्ती कित्ती कामं करतयं, बघ बघ , जरा पेपर उघडुन. आणि आपल्याला हे ठावुकच नव्हत बघ.  

म्हणजे टेकाडॆ भावजी " जागो इंडिया जागो " ची जाहिरात सरकारनी गंभीरपणॆ घेतलेले दिसतेय की काय. सगळ्यांना खडबडुन जाग करताय की काय ?

अग मीने , वाच जरा वाच, उत्तर तेथेच मिळेल.  




अहो टॆकाडॆभावोजी, वाटलच होत मला असच काही तरी असणार.  झाली का पाच वर्षे ?  अंमळ बसा ह , थालीपीठ लावते तुमच्या साठी. 





No comments: