Saturday, February 14, 2009

"उत्खनन" - गौरी देशपांडे

"जी गोष्ट मिळणं न मिळणं हे इतकं सर्वस्वी दुसऱ्या कुणावर अवलंबुन आहे तिची आसक्ती का धरावी ?

काही पुस्तकांचे ते वाचुन झाल्यानंतर आपल्या पुरते त्याचे अस्तित्व संपते,तर काही पुस्तके वाचतांना त्याच्याशी आपण समरुप होत जातो, त्यातल्या पात्रांत, ते पुस्तक लिहिणाऱ्यात. मग कधीतरी अचानक जाणॅवते की अरेच्या आपणही नकळतपणे त्यांत गुंतत चाललो आहे, तिच्यासारखाच विचार करायला लागलो आहे, बोलायला लागलो आहे, वागायला लागलो आहे, मग समजावे त्या पुस्तकाचा किंबहुना त्या लेखिकेचा आपल्यावर पगडा बसत चालला आहे, हे सामर्थ असते त्या लेखिकेचे, गौरी देशपांडेचे.

"उत्खनन" वाचायला घेतलयं. हे मी अजुन पर्यंत वाचले कसे नव्हते, मला वाटत होते की संपुर्ण गौरी देशपांडे वाचुन झालीय.
गौरी का आवडतात ? त्या आपल्या लिखाणातुन सतत संवाद साधत असतात म्हणुन के आणखी कशामुळे ?

No comments: