Saturday, February 13, 2010

जलेबी की तलाश मे


जिलेब्या आणि मठ्ठा राजाभाऊंना परमप्रिय. लग्नाच्या पंगतीत एक वेळ जिलेब्याची ताट फिरवणारा वाढपी त्यांना वाढुन वाढुन दमेल पण त्यांचे खाणे थांबणे त्रिवार अशक्य.

तर त्यांना विलेपार्लेतील रस्तातुन चालता चालता अचानक जिलेब्या आठवायला, इंन्दौरच्या सराफ्यात धाव घ्यावीशी वाटली. ( येवढे विज्ञान प्रगत झालयं पण एक बटन दाबल्यावर "ड्र्‌र्‌र्र्‌कन इकडुन गायब , तिकडे प्रगट " होणारी सोय काय शोधलेली नाही, नको नाहीतर "फ्लाय " चित्रपटात जे काही झाल त्यासारखं झाल तर खाद्यपदार्थाबरोबर आणखी कशाकशावर जावुन बसावे लागेल).

पाय नेतील तेथे चालत रहायच्या या सवयीने त्यांना "रामकृष्ण" च्या दारात पोचवले. काही उपहारगृहांची तुमचे नाते का कोण जाणे कधीच जुळत नाही. रामकृष्ण हे त्या पैकी एक.

बाहेर चक्क जिलेब्या तळत बसलेले.

टपक, टपक, टप, टप . लाळ गळॆ, लोहचूबका प्रमाणे राजाभाऊ तेथे ओढले गेले.

पण हाय. रामा. जिलेब्या कडक. त्यात जिलेब्या देणाऱ्यानी जमिनीवरती खाली बालदीत असलेले घाण पाणी हाताने शिंपडत, कळकट, मळकट फडक्याने जमिन पुसायला बुट घातलेल्या पायाने सुरवात केली. ते पाणी, त्याचे तो वासवाला फडका हाताळणे, त्या माणसाचा अवतार .

जाम शिव्या दिल्या नंतर त्या जिलेब्यां शेवटी पोटाऐवजी पेटीत गेल्या.

मग काही दिवसात मालाडला बिकाजी मधे जाणॆ ठरले. स्थानका उतरल्या उतरल्या उतरल्या एम.एम. मिठाईवाल्याकडॆ गरमागरम जिलेबी चा आस्वाद घेतला तेव्हा कुठे जीव थंडावला.

खरच जीव थंडावला ? असे असते तर राजाभाऊ चेतनामधल्या जिलेबीच्या ओढीने रातोरात काळाघोडा महोत्सवाला गेले नसते.




संपादकाची टिप - हे लिहित असतांना ते अर्धवट सोडुन भावना अनावर झालेल्या राजाभाऊ मुंबादेवीला "मुंबादेवी जिलेबीवाला " कडॆ जिलेबीपापडी खायला गेलेले आहेत.





No comments: