Wednesday, October 05, 2022

विनय

 आज काळबादेवीच्या दर्शनाला चालत जातांना ( हे अनवाणी घरुन चालत जाणॆ नव्हे, तर रेल्वेस्थानकावरुन ) राजाभाऊंना अचानक जाणवलं , आपण सतत त्याच त्याच उपहारगृहात खायला जात आहोत आणि तेथे तेच तेच पदार्थ खात आहोत. 

मग त्यांनी निश्चय केला आज कुठल्यातरी नव्या जागी जायचे.  

या निश्चयाला पहिल्याच घासाला मोडता घातला तो काळेकाकुंनी. त्यांना साबुदाणा वडा खाण्यासाठी "विनय" मधे जावेसे वाटत होते. साबुदाणा वडा पेक्षा त्यासोबत मिळणारा "तो" पदार्थ त्यांना जास्त आवडत असतो.

मग काहीतरी राजाभाऊंना तिखट, चटकदार, झणझणीत खावेसे वाटले, मग आपली नेहमीचीच उसळ आणि तेच पाव. ह्या उसळला दुसरा पर्यायच नाही  

एक गोड दही मिसळ आणि त्यानंतर चविष्ट बटाटावडा. 

या ठिकाणाचा बटाटावडा हा काहीसा वेगळाच असतो  

मुंबईमधे मराठीमोळी खाद्यपदार्थांसाठी "विनय" उत्तम, सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ट आहे.








No comments: