Sunday, January 31, 2010

सेराइकेल्ला छाऊ नृत्य गुरु गोपालप्रसाद दुबे आणि त्यांचा परिवार, त्रिनेत्र छाऊ डान्स सेंटर , सेराइकेल्ला.

जेव्हा खावु का नको असा संभ्रम मनी उत्पन्न होतो तेव्हा न खाणे केव्हांही चांगले , हाच नियम लावायचा झाला तर जेव्हा जावु का नको जावु अशी मनाची दोलायमान स्थिती निर्मांण होते तेव्हा जाणे केव्हाही उत्तम.

पश्चिम उपनगरामधल्या जिवघेण्या गर्दीवर , तुंबलेल्या वाहतुकीवर मात करीत रेंगाळलेल्या स्कायवॉक नामक नव्या कुरणाच्या कामाने सत्यानाश होवुन राहिलेल्या रस्तातुन मार्गक्रमण करीत, परत मागे फिरण्याचा विचार मागे सारत, थकल्या जिवास घरी पोचवण्याची उर्मी दाबत , राजाभाऊ ऐन वक्ती झारखंड मधील " सेराइकेल्ला छाऊ(उच्चार चुकीचा असावा ) नृत्य पहायला अखेरीस "पृथ्वी" मधे पोचले. मनात धाकधुक, वेळेवर पोचतो की नाही याची.

कार्यक्रम सुरु झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत आत मधे प्रवेश दिला जात नाही या कडक शिस्तीचे पालन करणारे पृथ्वी थियेटर. नाही तर आमचे टिळक स्मारक. कार्यक्रम सुरु होवुन तास दिड तास उलटलाय, लोक अजुनही आत येत आहेत, या बाजीरावांसाठी इतरांना उभे रहायला लावुन त्यांच्या परिचीतांनी अडवुन ठेवलेल्या जागी बसायला जात , आजुबाजुला बसलेल्या दुसऱ्यांचा रसभंग करत.

 छाऊ नृत्याच्या तीन घराण्यामधे  झारखंडमधील "सेराइकेल्ला" जे चैत्रपर्वच्या उत्सवात सादर केले जाणारे नृत्य सर्वात सुंदर, देखणॆ  मानले जाते, ते या मुंबईत भरलेल्या "छाऊ नृत्य महोत्सवात " सादर केले गेले.

या मधे मुखवटॆ ( जो सर्वात महत्वाचा भाग ) लावुन नर्तक पशुपक्षी, निसर्ग जसे की समुद्र किंवा मग शिकारी, नाविक यांच्यावर किंवा मग रामायण, महाभारत, पुराणे आदीं मधल्या प्रसंगावर आधारीत ८ ते १० मिनीटाचे नृत्य सादर करत असतात.

मुखवट्यांमुळे जे हावभाव, भावभावना चेहरा प्रगट करु शकत नाही, दर्शवु शकत नाही ते शरीराच्या, देहबोलीच्या द्वारे दर्शवले जाते.

आज एकंदरीत १२ नृत्ये सादर केली गेली.

रंगभुमीवर पाठच्या बाजुस आडव्या रांगेने बसलेले आठ वादक, शहनाई, व्हायोलीन, बासुरी. तीन ढोल , नगारा व झांज घेवुन नर्तकांना साथसंगत करत होते.

सुरवात झाली ती "जारताघट " नी. वादनानी वातावरण निर्मीती झाली. मग समोर आले ते "हरपार्वती " कुमारसंभवमच्या जरासा आधीचा तो प्रणयाचा काळ .

पावसाच्या आगमनाचे मोहरुन गेलाला मयुर, राधाकृष्णाचे प्रेम , हंसचे ती ग्रेसफुल वागणे, डौलदार चाल हे झाल्यानंतर मग "चंद्रभागा " सादर केले गेले. कोणार्क मधल्या सुर्यमंदिराची कथा. चंद्रभागा आणि सुर्यदेव यांचे नृत्य संपल्यानंतर मग फुलपाखरु समोर आले. दुर्योधन आणि भीमाचे गधायुध्द, सागर , बरसा रिमझीम ( जे राजाभाऊंना खुप भावले वर्षाऋतुच्या आगमनाने प्रफुल्लीत झालेले लव्हबर्डस निसर्गाशी एकरुप होत, त्याची मजा लुटत, पावसाच्या पाण्यात क्रिडा करत एकामेकांच्यात भान हरपत ) तलवारबाझी, शिकारी आदी नृत्य झाल्यानंतर मग शेवटला क्रवेदातील "रात्रीसुत्र " वर आधारीत "रात्री" सादर केले गेले.

भारलेल्या मनांनी त्या साऱ्या कलावंतांसाठी जे टाळ्यांचे वादन केले गेले त्याची तोड नाही.

Chhau is a dance-drama from prevalent in Eastern India, There are thee major forms of Chhau, each known by it's geographic location. These are Purilia Chaau of West Bengal , Mayurbhanj of Orissa and Seraikella Chhau of Bihar (now, Jharkhand ) The complexity of this form lies in the fact that it represents the folk-classical continuum, considerably influenced by the trible, ritualistic, martial and classical traditions of region.

Chhau is traditionally danced during the annual Chaitra Parva ( Spring ) festival dedicated to Ardhanareeswara as prayer for abundant harvest .It is a particularly strong form in which the sinuous and fluid body movements are animated by raw and primal energy. Associated with Lord Shiva , it is the dance of the warrior and the ascetic, traditionally performed only by men.  


No comments: