Sunday, January 24, 2010

मोबाईल् मुळॆ "जे मन चिंती ते वैरी न चिंती "


मोबाईल मुळॆ आता माणुस चोवीस तास आपल्या संपर्कात रहायला हवा असा एक अत्याग्रह , समज मनात निर्माण झाला आहे.  मोबाईल वर संपर्क होत नसेल तर "काय झाले असेल : करत मनात उगीचच भिती वाटायला सुरवात होते.

फणासाडच्या अभयारण्यात गेलेला छोकरा, परत पुण्यालाच जायचा होता, रात्रीचे १०.३० वाजले तरी अजुन त्याच्याशी मोबाईलवर संपर्क होत नव्हता,  शेवटी त्याच्या मित्राला फोन केला व तो मुंबईला यायला निघाला आहे हे कळाले. काळजीत आणखीन भर.

आत जंगलात रेंज नसावी पण बाहेर आल्यानंतर तरी का मिळत नाही ? का ? हा आहे कुठे ?

राजाभाऊ वाट बघत गच्चीत उभे. इमारती खाली रात्री ११ वाजता मोटर सायकल वर दोन पोलीस येवुन उभे राहिले.

छातीत धस्स.

५-१० मिनी्टॆ त्यांचे वॉकीटॉकी वर बोलणॆ सुरुच.

अरे , काय पाहिजे तुम्हाला ? येथे तुम्ही काय करत आहात ?

धीर खचत चाललेला.

"येथे कोठे येवढ्या रात्री सुतारकाम सुरु आहे, तक्रार आहे.

हुश्श.

पाठोपाठ , छोकरा हजर. मोबाईलची बॅटरी डेड .

राजाभाऊंना आपले तारुण्यातले दिवस आठवले. किती दिवस, किती वेळा ते गिर्यारोहणाच्या निमित्ते जंगलात , किल्लावर फिरत असत . तेव्हा तर साधी दुरध्वनीची पण धडकी सोय नव्हती.

आणि ते एकदा पावसाळ्यात नाखिंडाला वरच्या रेंज वर रस्ता न सापडल्यामुळॆ अडकुन पडले होते, सारी रात्र त्यांनी जंगलात मुसळाधार पावसात चिखलात बसुन काढली होती, त्या रात्री घरच्यांचे काय झालेले असेले ?

2 comments:

Narendra prabhu said...

मोबाईल हा काहीवेळा ताप असतो
कधी समोर छोकरा तर कधी बाप असतो

रोहन... said...

तो पूर्ण अनुभव लिहा की... वाचायला आवडेल ... :)