Thursday, November 27, 2008

मुंबईमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्लाचा तिव्र निषेध.

अश्या प्रकारचे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करुन या भरकटलेल्या लोकांना काय मिळते ? 

यातुन काय साधते ?

या परिस्थीतीत सर्वांनी संयम बाळगण्याची आवश्यकता आहे. कृपया करुन अफवा फैलावु नकात, आपल्या चर्चा भलतीकडे भरकट जावुन देवु नकात. या प्रसंगाचे कृपया करुन राजकारण करु नका, देशावरील या हल्लाचा संर्वांनी मिळुन मुकाबला करण्याची गरज आहे.

चॅनलवाल्यांनी ही दहशतवाद्यांना देण्यात असलेल्या चोवीस तास प्रसिद्धीस आवर घालावे. याने त्यांचे उद्दिष्ट सफल होत चालले आहे. 

यात मृत्यृ पावलेल्यांच्या नातलगांचे जे जवळचा माणुस हरपल्याने नुकसान झाले आहे त्याची कल्पनाही करवत नाही.

1 comment:

Abhi said...

ह्या कारवाईत शहीद झालेल्या हुतात्मा हेमंत करकरे, हुतात्मा शशांक शिंदे, हुतात्मा विजय
साळसकर,हुतात्मा अशोक कामटे यांना त्रिवार वंदन!!!!