Tuesday, April 29, 2008

रंग केसरिया सिर पागा बंधले । वनवेलरिया रंग लै आयोरे



आपण आयुष्यभर किती गैरसमज उराशी बाळगुन जगतो. आपल्याला वाटते बसंत ऋतु आला म्हणजे, सारी सृष्टी, वॄक्ष, वेली, लता, कसे बहरुन येतात स्वतःहुन, कोणीच काहीच न करता. ही तर सारी निसर्गाची किमया.

चुक. साफ चुक. हा एक भ्रम. त्रिवार सत्य एकच.

खरच हा बहार आपोआप येतो का ? की त्यासाठी काहीतरी करायला लागते ?

लागते ना !

स्त्रीयांनी जी काही वनदेवतेचे व्रते आहेत ती सारी कशी निष्ठेनी पाळायला लागतात. तरच हा बहार प्रगटतो.

महाकवी कालीदासाने हे सारे सुंदर संकेतात जोडलेले. "माविकाग्निमित्र" या आपल्या नाटकात.

सीता अशोक बहरतो तो सुंदर स्त्रीच्या कोवळ्या पावलांचा स्पर्श झाल्यानंतर.
लवंगीची वेल आहे ती स्त्रीचा स्पर्श झाला म्हणजे उमलते.
स्त्री ने मद्य पिऊन त्याची चूळ अंगावर टाकली तरच बकुळ फुलतो,
मंदारवॄक्ष मारुतीचा लाडका, तो तरी ब्रम्हचारी आहे का ? तोही त्याच्याशी कुणी स्त्री हास्य विनोदाने आणि प्रणायचेष्टॆने बोलली तरच उमलतो.
सोनचाफाही तरूण स्त्री त्याच्याशी हासली तर बहरलो.
आंबा तर स्त्रीने त्याला हळूवार फुंकरानी फुलवले नाही तर मुळी मोहरतच नाही.
पुन्नागाचे झाड स्त्रीच्या मुखातुन रागदारीचे सुंदर संगीत ऐकल्याशिवाय मुळी अंकुरणारच नाही.
तिळाचे झाड फुलायला त्या कडे बाईने पाहावे लागते.
आणि कोरंटी फुलण्यासाठी तिला स्त्रीने मिठीत घ्यावे लागते.

"मालविका" - लेखक - आनंद साधले मधुन साभार.

खंत एकच सिमेंट कौंक्रीट च्या जंगलात आपण सारे विसरुन गेलोय. वनदेवतेला, सॄष्टीला आणि स्वतःच्या मनालाही.

No comments: