Saturday, August 07, 2010

काय होणार ?

नुसत्या रुग्णालयाला भेटी देवुन काय होणार ? त्या वेळेपुरती ती रुग्णालयं चकचकीत केली जातात. 
केवळ परप्रातीयांच्या माथी दोष देवुन काय साध्य होणार ?

मुळ समस्या आहे तशीच राहीलेली. 
अस्वच्छ मुंबई, गलिच्छ मुंबई, स्वतःला ओरबडुन देणारी, स्वतःचा लचका तोडुन देणारी मुंबई, स्वःताला लुटु देणारी मुंबई.. 

हे शहर स्वच्छ, साफसुतरे करण्यासाठी गरज आहे ती लोकसहभागाची, लोकचळवळीची.  
गरज आहे ती नेत्यांच्या शब्दासाठी आपले प्राणपण देणाऱ्यां कार्यकर्ते, नेते, नगरसेवक, आमदार यांनी रस्तावर उतरण्याची. 

स्वच्छतामोहीमी आखण्याची.

पण ....

आपले आपल्या शहरावर एवढे प्रेम असेल तर हे आदेश दिले जावेत, 

रस्तावर उतरा, विभागवार, रस्तावार , गल्लीवार रहिवाश्यांच्या सभा घ्या, युध्दपातळीवर प्रयत्न करुन मुंबई स्वच्छ करा.

मुळकारण समुळ नष्ट व्हावे. 

(केवळ मलेरीयाविरुद्ध युध्दाचे फलक लावुन काय होणार ? दक्षिण मुंबईत ज्या गल्लीमधे ही शिबीरे भरवली गेली, धुरफवारणी केली गेली, घरगल्यांमधे साठलेल्या सांडपाण्यावर किटकेनाशके फवारली गेली, त्याऐवजी त्या विभागातल्या घरगल्लांची सफाई केली गेली असती तर ? )


1 comment:

Varsha said...

Exactly...keval bolun kahich hot nahi......kahi kela pahije