Saturday, October 13, 2007

श्री. जयतीर्थ मेवुंडी

माझ्या आयुष्यात कायकाय, कितीतरी , आणि केवढ्या गोष्टी करायच्या, ऐकायच्या, पहायच्या, राहुन गेल्या आहेत किंवा आता पर्यंत मी केवढ्या मोठया स्वर्गीय आनंदाला मुकलो होतो, आहे, विनाकारण, सबळ सबबी शिवाय , केवळ माझा मुर्खपणामुळे, माझा आळशी पणा मुळे, केवळ बायकोला "तुझा मुळेच हे राहुन जाते " दोष देत, याची सारी जाणीव आज श्री. जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेला केदार राग ऐकताना झाली.
किती वेळा त्यांचा मुंबईत कार्यक्रम झाला असेल . पण मी त्यात कोठे होतो ? आणि का नव्हतो ?

आपल्याच विश्वात, समस्यात, गुरफटलेलो मी, आता तरी जागे पणी जीवन जगायला हवे.

No comments: