Sunday, April 15, 2007

वळ्वाचा पाउस

सटासट, सटासट, थडाथडा थडाथड, गारांचा वर्षाव होत होता, अवचित वळवाच्या पावसाने खिंडीत गाठले. आज सायंकाळी चारच्या सुमारास खाली दुरवर क्षितीजावर धुळीचे लोटच्या लोट उसळु लागलेले वरुन दिसत होते, बोलबोलता वातावरण अंधारुन आले, क्षणभरात हे धुळिचे वादळ वरती येवुन ठेपले. आपण डी एस के विश्वात आहोत हा संभ्रम, हा तर आखाती प्रदेशच आहे की काय ? चहुओर धुल आणि मातीचे राज्य पसरलेले. हातापलीकडचे ही दिसु नये हि परिस्थिति.

अकस्मात हे सारे निसर्गाचे भयानक वातावरण गायब झाले, सर्व काही एकदम स्वच्छ झाले. पण ही होती वादळापुर्वीची शांतता.

परत एकदा काही काळानंतर वातावरण अंधारुन आले, गगनात बिजुरिया चमकु लागल्या, विजेचे तांडव नॄत्य सुरु झाले, आता प्रतिक्षा होती केव्हा एकदा सुरु होतो गारांचा वर्षाव ह्याची. जास्त वेळ वाट बघावी लागली नाही, गरजत, बरसत सुरु झाला वळवाचा पाउस, आपल्या आयुधासह, एका हाती भल्यामोठाल्या गारा , दुसऱ्या हाती बोचरे, थंड वारे घेउन बेसावधांची त्रेधातिरपट उडवित. लहानात लहान मुल होत मी लागलो गारा वेचायला, मुबंईच्या माणसांना वळवाचा पाउस, गार म्हणजे नाविन्यच की.

हवेतील गारवा मस्तपैकि वाढला, वातावरणात बेहोशी, मदहोशीचे माहोल, संपुर्ण भिजलेलो मी, त्यात सोबत गिरिजादेवींचे " पिया नही आये, काली बदरीया बरसे "

तुम भी होती अच्छा होता.

No comments: