Wednesday, April 18, 2007

नियम म्हणजे नियम.

एक, दोन, तीन, पाच, आठ, तेरा, एकवीस, जेव्हा असंख्य वाहानचालक एकाच जागी वर्षोनुवर्षे तो एकच वाहतुकीचा नियम भंग करीत असतील तर तो दोष केवळ वाहानचालकांचाच असु शकतो काय ? ह्याच एका जागी नियम मोडणाऱ्यांना पकडण्यासाठी वाहतुक पोलिस नियमितपणे कसे हजर असतात ? अनेक ठिकाणी डोळेझाक का केली जाते ?

स्थळ १ : ताडदेव पासुन हाजी अलीला जाताना उजवीकडची लेन, महालक्ष्मी रैल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहानांसाठी आहे, परंतु रोजच्या रोज अनेक वाहानचालक येथे घोळ घालतात व ह्या लेन मधुन वरळीला जाणाऱ्या रस्ताकडे वळतात आणि अलगद कायद्याच्या रक्षकाच्या हाती सापडतात.
ह्या चुकणाऱ्यांचे प्रबोधन करायचे कोणी? मार्गदर्शक फलक लावायचे कशासाठी ?

स्थळ २. : एरॉस चित्रपटग्रुह, जमशेट टाटा रोड, हाकेच्या अंतरावर वाहतुक पोलिस चोकी आहे. येथे वहाने उभी करु नये चा फलक आहे तरी पण वहाने सुखाने उभी असतात, अगदी बसथांब्यावर सुद्धा.

स्थळ ३. : एरॉस चित्रपटग्रुह, जमशेट टाटा रोड, मी यामाहावर, सरळ महर्षि कर्वे रोडच्या दिशेने निघालेलो, पहिलाच पाऊस, रस्ता निसरडा झालेला, सिग्नल अंबर झालेला, मी झेब्रा क्रॉसींग वर थांबलेलो. पर्याय दोन होते, नियमाचे पालन करण्यासाठी, अफाट गर्दीतल्या माणसांना टाळत किंवा उडवत पुढे निघुन जाणे, त्याच बरोबर स्वताचा जीव धोक्यात घालणॆ कारण समोरील वाहतुक (लोकांना टाळेटाळे पर्यंत) सुरु झाली होती. मला दंड भरायला लागला.

स्थळ : ग्रांटरोड, सिग्नल अंबर झालेला, मी झेब्रा क्रॉसींग वर थांबलेलो नाही कारण नियमाचे पालन झाले पाहिजे. कोपऱ्यावर उभ्या असलेल्या वाहतुक पोलिसांनी माझ्या कडुन दंड वसुल केला, सिग्नल मोडल्याबद्द्ल.

No comments: