Friday, April 13, 2007

आंबा पिकीतो रस गळीतो, कोकणचा राजा झीम्मा खेळीतो.

ज्याच्या मंजिरी कामदेवाच्या पंचबाणापैकी एक आहेत असा हापुस आंबा यंदाला गेला कुठे ?

पिवळसर, केसरी रंगाचे हे डोलदार फळ, फळांचा सम्राट, ज्याचे माधुर्य व सुवास काय वर्णावा ? घरी अर्धवट पिकलेले फळ आणावे, त्याची अढी लावुन पिकण्यासी योग्य समय द्यावा, नैसर्गीकरीत्या, पुर्णपणे पिकल्यावर त्यासी आंजारुन गोंजारुन त्याच्या रंगरुपाचे , सुवासाचे कौतुक करीत लडिवाळपणे, हळुवारपणे, हाताळत, त्याचा योग्य तो मान राखत आस्वाद घ्यावा, कधीतरी छान पैकी आमरसपुरीचा बेत आखावा, पायरी, राजापुरी आंबे रसाला उत्तम.

पण हे क्षण हल्ली दुर्मीळ होत चालले आहेत. बाजारात आंबा विकत घ्यायला गेलात तर दिसते काय तर काळे डाग पडलेले, काळसर, सुरकुतलेले, रसहीन अवकळा आलेले फळ, जे हातात सुद्धा घेववत नाही, आणि किमंती तर काय विचारुच नका. वरुन पिकलेले पण चवीला आंबट असणारे, रसायनामुळे दोन तीन दिवसात संपुर्णपणे पटकन पिकुन चटकन उतरणारे आंब्याची हालत बघवत नाही, हल्ली ह्या फळाची मिजास ओसरत चालली आहे.

ह्या अवनितीस जबाबदार कोण ? निसर्ग की त्यास ओरबडणारा मानव ?
मुबंईत भरणाऱ्या आंबामहोत्सवात बऱ्याच वेळा उत्तम दर्जाचे फळ मिळुन जाते, मी ह्या आंबामहोत्सवात व माझ्या माहितीत दोन कुटुंब आहेत जे विजयदुर्ग व पालशेट वरुन त्यांच्या घरचे आंबे मुंबईत मर्यादित प्रमाणात आणुन विकतात , त्याच्याच कडून आंबा खरेदी करतो.
ता.क. दुबईत पाठवलेल्या आंब्याला दर्जा नसल्यामुळे मागणी अजीबात नाही व तो सर्व माल तसाच पडुन आहे हे वर्तमानपत्रात वाचुन तसे बरे वाटले. आमच्या तोडातला उत्‍तम दर्जाचा माल काढायचा व तो परदेशी पाठवावचा.

2 comments:

कोहम said...

harekrishnaji...ajach paper madhe batami vachali ki akshayya tritiyeparyanta amba swasta hoil...

HAREKRISHNAJI said...

let us hope so. Yesterday I bought @ rs.175.00 per doz. very small size, medium sine rs.450.00 per doz. God help su