Wednesday, September 30, 2009

यांचा जांबाज खेळ होतो पण मुक्या प्राण्याचा जीव जातो


पशु, पक्षी , जलाचर कोणासाठी खाण्याच्या उपभोग्य वस्तु तर कोणासाठी खेळण्याच्या .


कलर चॅनल , खतरों का खिलाडी नामक मालिका, सुत्रधार सिनेअभिनेता अक्षय कुमार.


पोहोण्याच्या तलावात मुस्कट आवळलेल्या (तोंड बांधलेल्या ) लहान सुसरी सोडलेल्या. त्या तलावात जिगरबाज (? ) खेळाडुनी उड्या टाकायच्या , असहाय सुसरींच्यी शेपट्या पकडुन त्यांना बाहेर काढायच्या व तलावाबाहेर असलेल्या माणसाच्या हातात द्यायच्या मग तो माणुस तसेच त्यांच्या शेपट्या पकडुन त्यांना एका पेटीत ठेवणार. जो जास्त सुसरींना पकडॆल तो विजेता.


य अती उत्साही माणसांना काहीच दयामाया नाही का ?
मुक्या जनावरांशी चाललेला हा खेळ घ्रुणास्पद आहे. दुर्दैवी आहे.
अक्षयकुमारजी , आपल्या अंगात येवढी खुमखुमी असेल, शौर्य गाजवण्याची हौस असेल, आपली ताकद दाखण्याची मस्ती असेल तर त्या सुसरींचे तोंड उघडॆ ठेवा ,बांधुन ठेवु नकात आणि मग पाहिले तेवढ्या पाण्यात उड्या मारा.
असहाय्य प्राण्यापुढे कुठेले झालात तुम्ही खतरों का खिलाडी ?

No comments: